करप्या रोगाने भात पिकाची दुरवस्था, शेतकरी चिंतेत
वार्ताहर/ नंदगड
गेल्या काही दिवसापासून खानापूर तालुक्मयात पाऊस पडत आहे. याचा परिणाम ऐन पोसावणीला आलेल्या भात पिकावर होत आहे. परिणामी यावषी उत्पादनात घट होण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. पावसाचे पाणी ऐन पोटरीला आलेल्या भात पिकात शिर्य्ााने लोंब काळे पडण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता काही दिवस पाऊस जाण्याची आवश्यकता आहे.
नंदगड सह खानापूर तालुक्मयात पावसाळय़ातील चार महिने बऱयापैकी पाऊस होतो. त्यामुळे येथील शेतकरी भाताचे पीक घेतात. भात पीक तालुक्मयातील प्रमुख पिक म्हणून ओळखले जाते. खानापूर तालुक्मयातील नंदगड, बिडी, हलशी, हलगा, कापोली, लोंढा, गुंजी, शिरोली, नेरसा, रामगुरवाडी, बरंगाव, गर्लगुंजी, चापगाव, लालवाडी, बेकवाड, इटगी, गोधोळी, भुरूनकी, पारिश्वाड, गंदिगवाड, लोंढा, कक्केरी, जांबोटी, कणकुंबी, हेम्माडगा भागात भात पीक घेण्यात येते. जांबोटी, कणकुंबी, शिरोली वगळता अन्य सर्वच भागात भाताची पेरणी करण्यात येते. तर जांबोटी, कणकुंबी, शिरोली भागात भाताची रोप लावणी केली जाते. यावषी कृषी खात्यातर्फे तालुक्मयातील 40000 हेक्टर जमिनीत भात लागवडीचे उद्दीष्ठ ठेवण्यात आले होते. यावषी 36000 हेक्टरमध्ये भाताची लागवड करण्यात आली आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला शेतकऱयांनी भाताची पेरणी केली होती तर जुलै महिन्यात भाताचे रोप लावणी करण्यात आली होती.
मध्यंतरी काही दिवस पावसाने ओढ दिली होती. परंतु त्यानंतर पिकाला जेवढा अत्यावश्यक होता तेवढा पाऊस झाला. परिणामी पिकाची जोमाने वाढ झाली. सध्या कमी पाण्याच्या जमिनीतील म्हणजेच माळरानावरील भात पिके पोसावली आहेत. तर पानथळ जमिनीतील भात पीक पोसवणीच्या मार्गावर आहे. भात तरारून आले आहे. परंतु पाऊस दररोज पडत असल्याने भाताच्या पोटरीमध्ये पाणी गेल्याने भात पीक काळे पडत आहे. अशाच पाऊस नियमित राहिल्यास हाता तोंडाला आलेल्या भात पिकावर पाणी सोडण्याची वेळ शेतकऱयावर येणार आहे.