नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अफगाणिस्तानच्या नागरीकांना भारताने दिलेल्या व्हिसांची चोरी पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तचर संस्थेचे समर्थन असलेल्या दहशतवादी गटांनी केल्याचे उघड झाले आहे. अनेक अफगाण नागरीकांच्या पासपोर्टवर भारताने व्हिसे दिले होते. मात्र, गेल्या महिन्यग्नाभरातील गोंधळाचा लाभ उठवून आयएसआयसमर्थित दहशतवादी गटांनी हे पासपोर्ट आणि व्हीसे चोरले आहेत. काबूल येथील एका खासगी ट्रव्हल एजन्सीच्या कार्यालयातून ते चोरण्यात आले आहेत.
असे किती पासपोर्ट चोरीला गेले याचा शोध ही एजन्सी घेत आहे. ही संख्या 300 पेक्षा कमी नसावी असे प्राथमिक अनुमान आहे. या पासपोर्ट आणि व्हिसांचा दुरुपयोग भारतात दहशतवादी घुसविण्यासाठी केला जाऊ शकतो. त्यामुळे भारताने ही चोरी गंभीरपणे घेतली असून कठोर उपाययोजना केली आहे.
जुने सर्व व्हिसा रद्द
कोणत्याही अफगाणिस्तानच्या नागरीकाला भारतात यग्नायचे असेल तर त्याला नवा ई-व्हीसा काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच जुने सर्व व्हिसे पूर्णतः रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे चोरी करण्यग्नात आलेले व्हिसे आता निरुपयोगी ठरले असून त्यांचा उपयोग कोणत्याही एजन्सीला करता येणार नाही, अशी व्यवस्था करण्यग्नात आल्याने पाकिस्तानचा डाव फसल्यात जमा आहे.