तरुण भारत ऑनलाइन टीम
कर्नाटकात हिजाब प्रकरणावरून मोठा वाद सुरु आहे. त्याचे पडसाद अनेक ठिकाणी उमटत आहेत. यामुळे कर्नाटक सरकारने शाळांसह सर्व शैक्षणिक संस्था तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आत्ता या प्रकरणावरून नोबेल शांतता पारितोषिक विजेती आणि महिला हक्क कार्यकर्त्यी मलाला युसूफझाईने ट्विटरवरुन भाष्य केले आहे.
“कॉलेज आम्हाला अभ्यास आणि हिजाब यापैकी एक निवडण्यास भाग पाडत आहे. मुलींना त्यांच्या हिजाबमध्ये शाळेत प्रवेश नाकारला जाणे हे भयावह आहे. कमी किंवा जास्त कपडे घातल्याने महिलांच्या वस्तुनिष्ठतेवर आक्षेप घेतला जात आहे. भारतीय नेत्यांनी मुस्लिम महिलांकडे होत असलेले दुर्लक्ष थांबवले पाहिजे,” असे मलालाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.