वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर आहे. उभय संघातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला यापूर्वी प्रारंभ झाला असून भारताने पहिली कसोटी जिंकून यजमान दक्षिण आफ्रिकेवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. या कसोटीत भारतीय संघाला षटकांची गती राखता न आल्याने आयसीसीच्या नियमानुसार दंड करण्यात आला आहे.
भारतीय संघाला मिळणाऱया सामना मानधन रक्कमेतील 20 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. पहिल्या कसोटीत षटकांची गती राखता न आल्याने भारतीय संघाला विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप स्पर्धेतील एका गुणालाही मुकावे लागले आहे. सदर मालिका विश्व कसोटी चॅम्पियन्सशीप अंतर्गत खेळविली जात आहे. पहिल्या कसोटीत भारतीय संघाची षटकांची गती धिमी असल्याचे दिसून आले. त्यामुळे या संघातील प्रत्येक खेळाडूला मिळणाऱया सामना मानधनातील 20 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागणार आहे. भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा 113 धावांनी दणदणीत पराभव करून आघाडी मिळविली आहे.