ऑनलाईन टीम / श्रीनगर
गेल्या काही दिवसांपासुन जम्मु- काश्मिर आणि पाकिस्थान दरम्यानच्या भागात पाक पुरस्कृत दहशत वाद्यांच्या हालचाली वाढल्याने भारतीय लष्कराने या परिसरावर करडी नजर ठेवली आहे. गेल्या काही आठवड्यात दशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय ९ जवान शहीद झाले होते. याच जम्मुच्या सेक्टरमध्ये ही कारवाई करण्यात आली.या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं आहे.
भारतीय जवानांनी केली ही कारवाई ही राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये भारतीय लष्कराने ही कारवाई केली. भारतीय लष्कराच्या १६ पोलीस बटालियनकडून याच भागात दडून बसलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अजूनही चकमक सुरु असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांनी दिली आहे.
भारतीय लष्कराची दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत ९ जवान झाले असल्याने कारवाईत राजौरी सेक्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन राव यांनी १६ ऑक्टोबर रोजी या प्रदेशाला भेट दिली होती. यावेळी राव यांनी लष्कराच्या कारवाई संदर्भात चर्चा केली होती.