ऑनलाईन टीम / बीजिंग :
पूर्व लडाख आणि सिक्कीममधील सीमावाद चर्चेतून सोडवण्याचा निर्णय दोन्ही देशांच्या वरिष्ठ पातळीवरील लष्करी अधिकाऱ्यांनी घेतला. त्यानंतर चीनने पुन्हा एकदा कुरघोडी करत भारताच्या सीमेजवळ हजारो सैनिक तैनात केले आहेत.
चीनच्या उत्तर-पश्चिम भागात अवघ्या काही तासात चीनने हे सैन्य तैनात करून भारताला आपण कमी किती वेळात सैन्य तैनात करू शकतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. या सैनिकांना बस, ट्रेन आणि विमानातून या ठिकाणी आणण्यात आले आहे. या सैनिकांमध्ये पीएलए एअर फोर्सचाही समावेश आहे. काही तासात 3000 किमी चे अंतर कापून हे सैन्य भारतीय सीमेजवळ दाखल झाले आहे.
दरम्यान, पूर्व लडाखमध्ये सुरू असलेला वाद हा शांततेद्वारे आणि द्विपक्षीय करारानुसार सोडवण्यात येईल. द्विपक्षीय संबंध अधिक दृढ होण्यासाठी सीमा भागात शांतता आवश्यक आहे. असे दोन दिवसांपूर्वी झालेल्या दोन्ही देशांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत ठरले होते. त्यामुळे तणावाच्या मुद्यांवर चर्चर्चेतून तोडगा काढण्यासाठी भारत आणि चीनचे एकमत झाले होते. त्यानंतर नरमाईची भूमिका घेणाऱ्या चीनने आज कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे.