मिठाईचे वाटप करून क्रीडाप्रेमींकडून आनंदोत्सव साजरा
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
टोकिओ ऑलिंपिकमध्ये गुरुवारी झालेल्या पुरुषांच्या हॉकी लढतीत जर्मनी संघाचा 5-4 असा पराभव करून 41 वर्षांनंतर भारताला पदक मिळवून दिले आहे. या विजयानंतर बेळगावात जल्लोष करून मिठाई वाटण्यात आली.
1964 साली बेळगावचे सुपुत्र बंडू पाटील व लक्ष्मण यांनी हॉकीत ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यानंतर 1980 साली भारताला शेवटचे सुवर्णपदक मिळाले होते. त्यानंतर जवळपास 41 वर्षानंतर भारताला कांस्य पदक मिळाले आहे. भारताने हा सामना जिंकल्यानंतर संपूर्ण भारतात हॉकी संघाचा जयजयकार करण्यात आला. सायंकाळी धर्मवीर संभाजी चौकात बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेतर्फे विजयी भारतीय संघाचे अभिनंदन करून जल्लोष करण्याचे ठरविले. यावेळी बेळगाव जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष धनंजय पटेल, ज्ये÷ सभासद खलीक बेपारी, सादीक शेख, सचिव साकिब बेपारी, शकील कोतवाल, जी. ए. जागिरदार, उत्तम शिंदे, नेमीनाथ कंग्राळकर, लक्ष्मण सैनुचे, भुपेंद्र पटेल, गणपत कडोलकर, विजय बी., गोविंद फडके, चिराग पटेल, श्रेयस जोशी, गौरव पटेल, राहुल पटेल आदी सभासद उपस्थित होते. बेळगावचे हॉकी ऑलिंपिकपटू कै. बंडू पाटील यांच्या प्रतिमेला खलीक बेपारी व धनंजय पटेल यांनी पुष्पहार घालून मानवंदना दिल्यानंतर मिठाईचे वाटप करण्यात आले. त्यानंतर चौकात फटाक्मयांची आतषबाजी करून जल्लोष करण्यात आला. यावेळी माजी उपमहापौर संजय शिंदे, सुभेदार मनोहर पाटील, नामदेव सावंत, सुधाकर चाळके, रेहान पठाण, पूजा जाधव, सुप्रिया चाळके, श्रीकांत आजगांवकर, इदायत गवस, रियाज दुकानदार, समीउल्ला कडबी आदी कार्यकर्ते उपस्थित होते. धर्मवीर संभाजी चौकात मिठाई वाटप करून हॉकी संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.