ईईएफच्या परिषदेत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारत आणि रशिया यांची मैत्री काळाच्या कसोटीवर टिकलेली असून ती भविष्यकाळात आणखी दृढ होत जाणार आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम (ईईएफ) च्या वार्षिक परिषदेला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्यग्ना माध्यमातून संबोधित करीत होते. ही परिषद व्हर्चुअल पद्धतीने रशियाच्या व्लादिव्होत्सोक यग्ना शहरात होत आहे.
दोन्ही देशांनी कोरोनाच्या काळात एकमेकांशी दृढ सहकार्य केले आहे. इतर क्षेत्रांमध्येही भारत रशियाचा विश्वासू भागीदार होऊ शकतो. भारताकडे मोठय़ा प्रमाणात उच्च शिक्षित कर्मचारीवर्ग आहे, तर रशियाचा अतिपूर्वेकडील भाग नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. या दोन्ही परिस्थितींचा संयोग घडल्यास विकासाचे नवे दरवाजे उघडू शकतात. भारताने अतिपूर्व भागासाठी विषेश धोरण आखले असून त्याचे क्रियग्नान्वयन रशियाच्या सहकार्याने करण्याची भारताची इच्छा आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यग्नांनाही भारताच्या सहकार्याची अपेक्षा आहे. 2019 मध्ये आपल्या रशिया दौऱयात पुतीन यांनी रशियाच्या जहाज बांधणी कार्यक्रमात भारताच्यग्ना सहकार्याची अपेक्षा पेलेली होती, असे प्रतिपादन त्यांनी केले.
अनेक क्षेत्रांमध्ये भागीदारी
भारताच्या अवकाश कार्यक्रमाला रशियाचे मोठे सहकार्य मिळत आहे. गगनयान अभियानात रशियाने स्वारस्य दाखविले होते. तसेच दोन्ही देश उत्तर समुद्र मार्ग व्यापार आणि आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी खुला करण्यग्नाच्यग्ना प्रकल्पात भागीदार होणार आहेत. संरक्षण आणि आर्थिक क्षेत्रांमध्येही दोन्ही देशांचे एकमेकांशी उत्कट सहकार्य आहे, या बाबी पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केल्या.