दापोलीत राज्यपाल रमेश बैस यांचे प्रतिपादन
प्रतिनिधी/ दापोली
भावी पिढय़ांसाठी शेतीमधील गुंतवणूक आणि त्यातील उत्पादन यांचे महत्व अनन्यसाधारण राहणार आहे. शेती हा संपत्तीााs मोजमाप राहणार आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचा 41 वा पदवीदान समारंभ विद्यापीठाच्या डॉ. विश्वेश्वरय्या सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. यावेळी बोलताना बैस पुढे म्हणाले, देशात शहरीकरणाचा जोर वाढत आहे. अशा पार्श्वभूमीवर शेतीला अधिक महत्व प्राप्त होणार असून येणाऱया काळात इतर धनसंपत्तीपेक्षा ज्याच्याकडे शेती आहे, असे शेतकरी संपन्न व्यक्ती म्हणून ओळखले जातील. भावी पिढय़ांसाठी शेतीमधील गुंतवणूक व त्यातील उत्पादन यांचे महत्व अनन्यसाधारण राहणार आहे. शिक्षणाचा उपयोग केवळ नोकरीसाठी न करता युवकांनी राज्य व देशाच्या समृद्धीसाठी करावा, असे आवाहन बैस यांनी केले.
प्रमुख अतिथी केंद्रीय कृषी विश्वविद्यालय इंफाळ येथील कुलपती व भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी महासंचालक पद्मश्री डॉ.एस. अय्यपन म्हणाले, जागतिक स्तरावर कृषी उत्पादनात भारत अग्रेसर ठरला आहे. यापुढील काळात तज्ञ व शास्त्रज्ञांनी संशोधनाच्या माध्यमातून यात भर घालण्याची गरज आहे. विद्यापीठाचे प्रतिकूलपती व राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आगामी काळात कृषी विद्यापीठांमधील सर्व रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे राज्यपाल महोदयांनी आपल्या विधानसभेतील अभिभाषणात सांगितले होते, त्याची पूर्तता कृषी विभाग करेल आणि कृषी विभागांतर्गत सर्व पदे भरली जातील याची काळजी शासन घेत आहे, असे सांगितले.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांनी प्रास्ताविकात आजवर झालेल्या विद्यापीठातील संशोधनांची माहिती सादर केली तसेच विद्यापीठ राबवत असलेले विविध उपक्रम व संशोधने या बाबत माहिती दिली. पदवीदान सोहळ्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनो उद्घाटन राज्यपाल बैस यांच्याहस्ते करण्यात आले. बैस यांनी प्रत्येक दालनास भेट देऊन विविध संशोधनांची माहिती घेतली. यावेळी रत्नागिरी-रायगडचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार योगेश कदम, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. भरत साळवी, कोकण विभागाचे विभागीय आयुक्त महेंद्र कल्याणकर, कोकण विभागाचे पोलीस महासंचालक प्रवीण पवार, जिल्हाधिकारी एम. देवेंदसिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, प्रांतधिकारी शरद पवार आदींची प्रमुख उपिस्थिती होती.
राज्यपालांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
या कार्यक्रमात राज्यपाल बैस यांच्याहस्ते 34 पीएचडी, 105 पदव्युत्तर पदवी व 2105 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याच कार्यक्रमात वर्ष 2020-21 व 21-22 अंतर्गत सुवर्णपदक विजेत्यांचाही गौरव करण्यात आला. या व्यतिरिक्त इतर क्षेत्रातील सुवर्णपदक विजेत्यांना पदकासह प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले
राज्यपालांचे जिल्हाधिकाऱयांकडून स्वागत
विद्यापीठ परिसरातील हेलिपॅडवर राज्यपाल बैस यों आगमन झाल्यानंतर प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी एम. देवेंदसिंह यांनी त्यों स्वागत केले. विद्यापीठाचे कुलगुरू तसेच जिह्यातील महत्वाचे अधिकारी राज्यपाल बैस यांया स्वागतासाठी उपस्थित होते.