ऑनलाइन टीम / राजस्थान :
संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. भारत देशात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी राजस्थानमधील भिलवाडा या शहराने यशस्वी पॅटर्न देशासमोर ठेवला आहे.
काही दिवसांपूर्वी भिलवाडा येथे कोरोनाचा रुग्ण सापडला. त्यानंतर काही डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. त्यानंतर राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखाली सरकारने त्वरित प्रयत्न सुरू केले. संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करून शहराकडे येणारे सर्व रस्ते बंद केले. व राज्यातील 16 हजार आरोग्य कर्मचार्यांचे पथक भीलवाडा येथे पाठवण्यात आले. या पथकाने प्रत्येक घरात जाऊन स्क्रीनिंग केले. त्यातून काही कोरोनाबाधित रुग्ण सापडले.
त्यानंतर संपूर्ण शहरात लोक लॉक डाऊन जाहीर करण्यात आले. सोशल डिस्टसिंग चे पालन सुरू केले व शहरातील दहा लोकांचे स्क्रीनिंग 10 दिवसात करून संशयितांना वेगळे करण्यात आले. शहरातील सर्व हॉटेल, खाजगी रुग्णालय सरकारने ताब्यात घेतली व तेथे कोरोना रुग्णांना ठेवण्यात आले. त्यांच्या या प्रयत्नामुळे कोरोना रुग्णांची संख्या 27 वर मर्यादितच राहिले. व त्यातील वीस रुग्ण पूर्णपणे बरे झाले. अन्य सात लोकांची स्थिती सुधारत आहे.
दरम्यान, या पॅटनचे केंद्र सरकारनेही कौतुक केले असून लवकरच देशभरात हा पॅटर्न लागू करण्याचे संकेत दिले आहेत.