अंबाबाई मंदिर परिसरातील उद्योग, व्यवसाय सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी/कोल्हापूर
कोरोनाच्या काळात राज्यातील सर्वच देव-देवतांची मंदिरे बंद होती. त्यामुळे मंदिरे खुली करावी या मागणीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वfरोधीपक्ष नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विविध आंदोलन केली होती. त्यामुळे घटस्थापनेच्या मुहूर्तावर मां†दरे खुली करण्यात आली आहेत, भाजपच्या आंदोलनाला यश आल्याबद्दल महाद्वार चौकात भाजपच्या वतीने साखर-पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. उद ग आई उद, जोतीबाच्या नावांन चांगभल, गणपती बाफ्पा मोरया अशा घोषणा दिल्या.
जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना राज्यामध्ये इतर सर्व गोष्टी सुरु केल्या. परंतू लोकांना आत्मविश्वास देणारी श्रद्धास्थाने सरकारने बंद ठेवली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत एकत्र राहून शिवसेनेचे हिंदुत्व गेले हे दुर्देवी आहे. राज्यातील मां†दरे सुरु करण्याची सुबुध्दी मुख्यमंत्र्यांना उशिरा देवांनी दिली. दुसरी लाट, तिसरी लाट अशा पद्धतीने भीतीचे वातावरण निर्माण करून लोकांना लुटण्याचे काम सुरु आहे. सत्तेतील पक्षांना समाज, लोकहिताचे कोणतेही काम न करता सत्तेत राहून पैसे मिळवायचे आहेत. असा आरोप करी लवकर पुन्हा एकदा देवेंद्रजी फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वातील जनसेवेसाठी सक्षम सरकार सत्तेत यावे, अशी अंबाबाई चरणी प्रार्थना केली. भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव म्हणाले, भाजपच्या संघर्षामुळे या सरकारने मंदिरे खुली केली आहेत. शासनाने मां†दरांची दारे उघडलीत परंतु भक्तांना निर्बंघ व अटींमध्ये अडकवून ठेवले आहे. मंदिर परिसरातील व्यापार, व्यवसाय लवकरात लवकर सुरू करण्याची गरज आहे. स्था†नक भक्तांना दररोज ईपास अन्यायकारक असून, मंदिरामध्ये योग्य ती खबरदारी करून भक्तांना प्रवेश द्यावा. व्यवसायाची बंदी घातल्यामुळे फेरीवाल्यांना शासनाच्यावतीने महिन्याला आर्थिक मदत करावी. मंदिर परिसरातील व्यवसा†यक, व्यापारी, छोटे विक्रेते यांच्याबाबत अटी शिथिल कराव्या.
सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी प्रास्ता†वक केले. संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, भाजपा प्रवक्ते विजय जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरचिटणीस गणेश देसाई, प्रदीप उलपे, विजय आगरवाल, विजयसिंह खाडे-पाटील आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.