प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेच्यावतीने उभारण्यात आलेल्या आश्रय योजनेमधील घरांमध्ये अतिक्रमितांनी आसरा घेतला असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच काही लाभार्थींनी जागेवर अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले असल्याने याची चौकशी करण्याचा आदेश महापालिका आयुक्तांनी बजावला आहे. पाहणी करून अहवाल सादर करण्याची सूचना शुक्रवारी मनपाच्या अधिकाऱयांना केली.
वंटमुरी आणि कणबर्गी येथे आश्रय योजनेअंतर्गत घरे बांधून देण्याची योजना महापालिकेने राबविली होती. पण काहांना झोपडपट्टी योजनेअंतर्गत घरे मंजूर झाल्याने त्याठिकाणी स्थलातंर झाले आहेत. तसेच कणबर्गी येथील झोपडपट्टी निर्मूलन योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारतीमध्ये काहांनी अतिक्रमण करून ठाण मांडले आहे. यामुळे निवड झालेल्या लाभार्थींनी घरे मिळाली नसल्याची तक्रार महापालिकेकडे करण्यात आली आहे.
तसेच वंटमुरी येथील आश्रय योजनेतील लाभार्थींना मंजूर झालेल्या जागेपेक्षा जास्त अतिक्रमण केले आहे. यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच बोगस लाभार्थी असल्याने याबाबत मनपाकडे तक्रारी करण्यात आल्याने याबाबतची माहिती घेण्यासाठी महापालिका आयुक्तांनी महसूल निरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षकांना बजावला आहे. याबाबत शुक्रवारी अधिकाऱयांची बैठक घेऊन आश्रय योजनेतील लाभार्थींची माहिती आणि आवश्यक कागदपत्रे घेण्याची सूचना केली आहे.
मंजूर झालेल्या जागेपेक्षा जास्त अतिक्रमण झाले असल्यास त्याची माहिती घेण्याची सूचना आयुक्तांनी निरीक्षकांना केली आहे. त्यामुळे आता अनधिकृतरित्या अतिक्रमण करून ठाण मांडलेल्याचा शोध घेतला जाणार आहे. लाभार्थींकडे घर मंजुरीबाबतचे आवश्यक दाखले उपलब्ध नसल्यास अनधिकृत गृहित ठरविले जाण्याची शक्मयता आहे. अनधिकृतरित्या अनेकांनी आश्रय घेतला असल्याने आता याची माहिती पाहणी दौऱयानंतर उजेडात येण्याची शक्मयता आहे.