ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
गृहमंत्री अमित शहा यांनी आज पश्चिम बंगालमधील जनतेशी व्हर्च्युअल रैली दरम्यान संवाद साधला. यावेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, ममतादीदी, ज्या श्रमिक ट्रेन्सची तुम्ही ‘कोरोना एक्स्प्रेस’ अशी थट्टा केली, तीच तुमच्या ‘तृणमूल पक्षा’चा ‘निर्गमन मार्ग’ ठरेल. पुढे ते म्हणाले तुम्ही दिलेले ‘कोरोना एक्स्प्रेस’ हेच नाव तुमचा एक्झिट रूट होईल. कारण तुम्ही स्थलांतरित लोकांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. आणि हे श्रमिक ही गोष्ट कधीही विसरणार नाहीत, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.
पुढे ते म्हणाले, आम्ही सरकारचा हिशेब देत आहोत, ममाताजी तुम्ही देखील 10 वर्षांचा हिशेब द्या. मात्र, त्यात बॉम्ब स्फोट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मृत्यूंचे आकडे सांगू नका.
पुढे ते म्हणाले, आम्ही गरीब जनतेला आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून 5 लाख रुपये आरोग्य खर्चासाठी देऊ इच्छितो. परंतू हा निर्णय इथे लागू करण्यास परवानगी मिळत नाही आहे. ममता दीदी राजकारणाची देखील एक सीमा असते. आणि आपण आम्हाला म्हणता आम्ही राजकारण करतो. असे म्हणत शहा यांनी सांगितले की, बंगालमध्ये लवकरच सत्ता बदलेल आणि शपथविधी होताच तात्काळ बंगाल मध्ये आयुष्मान भारत योजना सुरू केली जाईल. असेेही त्यांनी यावेळी म्हटलेे आहेे.