प्रतिनिधी/ सातारा
फलटणचे राजे, आमचे सातारचे राजे, लोकशाहीतले राजे कसली आखणी करतात हे काळवेळच ठरवेल. जिल्हा बँकेची निवडणूक आली आहे. म्हणल्यावर थोडसं इकडे तिकडे होणारच. आमचं तर आहेच, बघू कोण कशी आखणी करतोय, अशा शब्दात जिल्हा बँकेच्या अनुषंगाने खासदार उदयनराजेंनी सूचक वक्तव्य करुन जिल्हा बँकेचे राजकारण ढवळून काढले आहे. दरम्यान, 8 मार्चला मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी होणार आहे. त्यामुळे मराठा नेत्यांची दोन दिवसांत बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मराठा नेत्यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, असेही उदयनराजे यांनी सांगितले. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली.
खासदार उदयनराजे यांनी आज सकाळी शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ास अभिवादन केले. त्यांच्यासोबत नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, माजी नगरसेवक प्रशांत अहिरराव, नगरसेवक ऍड. दत्ता बनकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उदयनराजे यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाइं& यांची भेट घेतली.
त्यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शंभूराज देसाई यांची आणि माझी मैत्री जुनी आहेच. माझ्या वडिलांचे आणि त्यांच्या वडिलांचे घनिष्ट संबंध होते. वरचेवर आम्ही दोघे भेटत असतो. मराठा आरक्षणाच्या संदर्भात त्यांच्यासोबत चर्चा झाली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी, विरोधी पक्ष नेते देवेंद्रजी आणि पवारसाहेबांसोबतही मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने चर्चा झाली आहे. दोन दिवसांत मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मिटींग होईल. त्यामध्ये पवारसाहेब असतील. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री शंभूराज देसाईही बैठकीला असतील. मराठा आरक्षणाचे राजकारण कोणी केले नाही आणि ते होवू असे वाटते. त्यासाठी श्वेत पत्रिका काढण्यात यावी. दि. 8 मार्चपासून मराठा आरक्षणाची सुनावणी सुरु होणार आहे. 8 मार्चला आमचे अधिवेशन होणार आहे. त्या अनुषंगाने चर्चा होणार आहे.
जिह्याला इतिहास असून जिल्हा आदर्श होण्याच्या दृष्टीने राज्यपातळीवर शंभूराज व सगळे आमदार करतील चर्चा करतील परंतु खासदाराच्या भूमिकेत केंद्रातील जे प्रश्न आहेत ते मांडू, अशी यावेळी उदयनराजेंनी ग्वाही दिली. मराठा आरक्षणावरुन लीड घेतले आहे, असे छेडले असता ते म्हणाले, लीड पहिल्यापासून घेतले होते. नेमके वकिलांच्यामध्ये आत्मीयता लागते. अशा वकीलांची नेमणूक करणे गरजे आहे. वकील फार मोठे आहेत. त्यांच जेवढे प्रक्टीस आहे, तेवढ आमचं वय आहे. कम्युनिकेशन गॅप आहे, असेही ते म्हणाले.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने छेडले असता जिल्हा बँक निवडणुकीची रणनिती आखण्याचे काम सुरु आहे. फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर, सातारचे आ. शिवेंद्रराजे, लोकशाहीतले राजे आखणी करत आहेत. बघू त्यांची आखणी काय आहे, मग ठरवू, असे म्हणत उदयनराजेंनी जिल्हा बँक निवडणुकीत आपली भूमिका काय असणार हे अद्याप गुलदस्त्यातच ठेवले आहे.