ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात आज 47 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 537 वर पोहचली आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाने 26 बळी घेतले आहेत. आरोग्य विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.
आज मुंबईत 28, ठाणे 15, पुणे 2, पिंपरी-चिंचवड आणि अमरावतीत प्रत्येकी 1 असे एकूण 47 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे.
राज्यातील सर्वात जास्त कोरोना रुग्ण मुंबईत आहेत. मुंबईत 306, पुण्यात 73, ठाणे आणि एमएमआर परिसरात 70, सांगली 25,अहमदनगर 20, नागपूर 16, बुलढाणा 5, यवतमाळ 4,सातारा आणि औरंगाबाद प्रत्येकी 3, कोल्हापूर आणि रत्नागिरी प्रत्येक 2 आणि सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, उस्मानाबाद, वाशीम, जळगाव आणि अमरावती येथे प्रत्येकी एका कोरोनाबधिताची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. 14 एप्रिलनंतर देशातील लॉकडाऊन संपला तरी राज्यातला लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. राजेश टोपे यांनीही त्याबाबतचे संकेत दिले आहेत.