ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात कोरोनाचे 440 नवे रुग्ण आढळले आहेत. तर 19 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत पावलेल्या 19 रुग्णांपैकी 12 जण मुंबईचे, 3 जण पुण्यातील तर जळगावातील दोन, सोलापूर आणि लातूर मधील एक – एक जण आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची एकूण रुग्ण संख्या 8 हजार 68 वर पोहचली आहे. अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट द्वारे दिली.
ते म्हणाले, महाराष्ट्र राज्यात आत्तापर्यंत 342 जणांचा मृत्यू झाला असून 1188 जणांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
राज्यात आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या एक लाख 16 हजार 345 नमुन्यांपैकी 1 लाख 7 हजार 519 जणांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. तर 8068 जन पॉझिटिव्ह आहेत. तसेच सध्या महाराष्ट्रात एकूण 1 लाख 36 हजार 926 लोक होम क्वारंटाईन असून 9 हजार 160 लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत.
– एकट्या मुंबई 5 हजार 407 कोरोनाग्रस्त
काल एका दिवसात एकट्या मुंबईमध्ये कोरोनाचे 358 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण संख्या 5 हजार 407 वर पोहचली आहे. तर गेल्या चोवीस तासात 12 जणांनी आपला जीव गमावला आहे त्यामुळे मुंबईतील मृतांची एकूण संख्या 204 वर पोहचली आहे.