ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मागील चोवीस तासात 10 हजार 309 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 लाख 68 हजार 265 वर पोहचली आहे, तर कालच्या दिवसात 334 रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पुढे ते म्हणाले, त्यातच दिलासादायक बाब म्हणजे बुधवारी एका दिवसात 6,165 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. त्यामुळे आतापर्यंत 3 लाख 05 हजार 521 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.25 टक्के इतके आहे.
सध्या राज्यात 1 लाख 45 हजार 961 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृतांचा एकूण आकडा 16 हजार 476 वर पोहोचला आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.52 टक्के इतके आहे.
सध्या राज्यात 9 लाख 43 हजार 658 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून, 36 हजार 466 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.