ऑनलाईन टीम / मुंबई :
लॉकडाऊनच्या काळात राज्यात सायबर संदर्भात 453 गुन्हे दाखल झाले असून, 239 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र सायबर विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी याबाबतची माहिती दिली आहे.
राज्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकूण 453 गुन्ह्यांची (ज्यापैकी 27 N.C आहेत) नोंद 1 जूनपर्यंत झाली आहे. या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी 188 गुन्हे दाखल झाले आहेत. तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्याप्रकरणी 181 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. tiktok व्हिडिओ शेअर प्रकरणी 23, ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी 8, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी 4 गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्याप्रकरणी 49 गुन्हे दाखल झाले आहेत. याप्रकरणी आतापर्यंत 239 आरोपींना अटक केली आहे. तर 107 आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे.
मुंबईतील काळाचौकीत आज एका गुन्ह्याची नोंद मुंबई विभागातील काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई शहरात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या 28 वर गेली आहे. या गुन्ह्यातील आरोपीने आपल्या व्हाट्सॲपद्वारे विविध व्हाट्सॲप ग्रुप्सवर कोरोनाग्रस्त नागरिकांबद्दल चुकीची व खोटी माहिती पसरवून त्यांची नावे देखील जाहीर केली होती.