हवामान बदलाचे गंभीर संकट जगभर निर्माण झाले असताना, महाराष्ट्र त्यातून वेगळा होऊ शकत नाही. मात्र हे संकट दूर कोठेतरी आहे, जंगलांना आगी लागणे, नद्यांना महापूर येणे, डोंगर ढासळणे आणि चक्रीवादळात सापडणे अशा प्रकारच्या दुर्घटना या विदेशात किंवा हिमालयाच्या पट्टय़ातच घडतात असे वाटणाऱया मराठी माणसाला गेल्या काही वर्षांमध्ये हवामान बदलाने जोराचा धक्का दिलेला आहे. या सर्व संकटातून सावरण्यासाठी आता आपल्याला बदललेच पाहिजे. अन्यथा काही खैर नाही, हा निसर्गाचा सांगावा गेल्या दोन दिवसातील आणि पुढच्या दोन दिवसात पडणाऱया पावसाने महाराष्ट्राला देऊ केला आहे. जुलै महिन्यामध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसासह महापुराचे संकट ओढवल्यानंतर त्याच काळात राज्यातील 15 जिह्यांमध्ये नुकसानकारक असा पाऊस पडला होता. त्यामुळे महाराष्ट्रावर मोठे संकट ओढवले. तत्पूर्वी आलेल्या चक्रीवादळाने मुंबईसह कोकण किनारपट्टीला अक्षरशः भांबावून सोडले. तेव्हाही मोठे नुकसान झाले. त्यानंतर पावसाने उघडीप घेतली. त्यामुळे उर्वरित महाराष्ट्रात पिकांच्या उगवण्याचे संकट निर्माण होते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. याच दरम्यान पडलेल्या पावसाने मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात फार मोठे नुकसान झाले होते. महाराष्ट्रातील या परिस्थितीचा आढावा घेणारे वार्तापत्र शनिवार दि. 4 सप्टेंबर रोजी ’तरुण भारत’ने प्रसिद्ध केले होते. महाराष्ट्र शासनाने हवामान बदलाच्या संकटांना सामोरे जाण्यासाठी वातावरणीय बदल परिषद स्थापण्याचा निर्णय घेतल्याबाबत या वार्तापत्रामध्ये उल्लेख करण्यात आला होता. उष्णकटिबंधातील महाराष्ट्राचे तापमान दोन ते अडीच अंश सेल्सीयसने वाढून महाराष्ट्रात मोठे संकट येऊ शकते. नजीकच्या वीस वर्षांमध्ये अशा प्रकारची अनेक आव्हाने निर्माण होऊन मुंबईसह कोकण किनारपट्टीतील महत्त्वाची ठिकाणे पाण्याखाली गेलेली असतील. मध्य महाराष्ट्रात तीव्र दुष्काळ, जंगलांमध्ये वणवे आणि त्यामुळे प्राणवायू शोषून घेऊन कार्बन उत्सर्जनाचे मोठे आव्हान निर्माण होईल. याबाबत भाष्य करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आणि महाराष्ट्रावर पुन्हा एकदा संकट ओढवले आहे. मंगळवारी झालेल्या पावसाने कोकणात चिपळूण, दापोलीमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. वशि÷ाr नदीत जुना बाजार पुलापर्यंत पाणी आल्याने पुन्हा चिंता पसरली आणि एनडीआरएफचे पथक तेथे पोहोचले. संगमेश्वर बाजारपेठेत आलेले पाणी आणि राजापूर तालुक्मयात मुसळधार पावसामुळे नागरिकांची चिंता वाढली. बुधवार, गुरुवारी काही भागात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने नागरिक चिंतेत पडले आहेत. पालघरमध्ये अतिवृष्टीचा तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार आदी भागात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने चिंतेत भर पडली आहे. विदर्भात रुद्रावतार धारण केलेल्या पावसामुळे मोठे नुकसान तर झालेच शिवाय सहा लोकांना आपले जीव गमवावे लागले. नुकत्याच सावरलेल्या मराठवाडा आणि विदर्भात पुन्हा एकदा पावसाने सुरुवात केल्याने मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. विदर्भातील अनेक नद्यांना पूर आला आहे. अतिवृष्टीमुळे धरणाचे दरवाजे उघडावे लागले आहेत. मराठवाडय़ात नांदेड जिह्यात पुन्हा पावसाने तडाखा दिला असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. गोदावरी नदी आणि तिला जोडणारे नाले ओसंडून वाहू लागले आहेत. हिंगोली, नांदेड, लातूर, बीड या सलगच्या पट्टय़ात सलग तीन-चार दिवस संततधार सुरू आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये दुसऱयांदा पावसाने हाहाःकार माजवला आहे. चाळीसगाव तालुक्मयात आणि शहरामध्ये झालेल्या नुकसानीतून सावरण्याआधीच पुन्हा पावसाचे आव्हान निर्माण झाले आहे. चाळीसगावमध्ये दोन नद्यांचे पाणी वाढत चालले आहे. औरंगाबादकडे जाणारा पर्यायी रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱया कन्नड घाटात दरडी कोसळण्याच्या घटना पुन्हा घडल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे तालुक्यात सुद्धा पावसाने घरांची पडझड झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने पुनरागमन केल्याने काही ठिकाणी पिकांना आधार झाला आहे. मात्र त्याच वेळी नदीकाठाने वाढणाऱया पाण्याने शेतकऱयांची चिंता वाढली आहे. सातारा जिह्यात कोकणाला जोडणाऱया घाट मार्गात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाल्यानंतर आणि महाबळेश्वरच्या परिसरातील अनेक गावांचा संपर्क तुटल्यानंतर आता पुन्हा वाहतूक सुरळीत होऊ लागली आहे. मात्र गेल्या दीड महिन्यापासून या परिसरात कोसळणाऱया दरडींमुळे लोकांमध्ये आणि वाहतूकदारांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. सांगली जिह्यात तालुक्मयात पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला असून वारणा धरण भरले आहे. अद्यापि दोन-तीन दिवस पाऊस पडणार असल्याने नेमकी काय परिस्थिती उद्भवते याबाबत शेतकऱयांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. गेल्या दोन-तीन दिवसातील पडलेल्या पावसाची आकडेवारी लक्षात घेतली तर प्रदीर्घकाळ ओढ घेऊन पावसाने एक दोन दिवसातच अतिवृष्टीपेक्षाही अधिक नुकसानकारक वृष्टी केली आहे. पाऊस पडत असला तरीही स्थिती काही चांगली नाही. यातून नुकसानच अधिक होण्याची चिन्हे आहेत. भविष्यात वाढून ठेवलेल्या आव्हानांचे हे टेलर आहे. यातून धडा घेऊन हाती असणाऱया अल्पकाळात पुढील वीस वर्षांचे आव्हान पेलायचे आहे. नुकसान टाळता येणार नसेल तर त्यातून मार्ग काढावा लागणार आहे. विशेष करून निसर्गाचे नुकसान करण्याचे टाळण्यासाठी सर्व ते प्रामाणिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. सर्वसामान्यांना याचा सर्वाधिक फटका बसतो. त्यामुळे या आव्हानातून बाहेर पडण्याला त्यांचे सहकार्य आवश्यक आहे आणि त्यासाठी त्यांच्या हिताचे निर्णयही घेतले गेले पाहिजेत. सध्याच्या पद्धतीने नोकरशाही वागत राहिली तर हे आव्हान कधीच बदलता येणार नाही. त्यासाठी तज्ञांकडून कृती आराखडा तयार करून घेऊन तातडीने त्याबरहुकूम उपाय सुरू करण्याची आवश्यकता आहे. तरच या संकटातून महाराष्ट्राला आपला जीव वाचवता येईल.
Previous Articleउत्तर प्रदेश निवडणूक प्रभारीपदी भाजपकडून धर्मेंद्र प्रधान
Next Article गणरायाच्या स्वागताची तयारी पूर्णत्वाकडे
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.