कुस्तीगीर परिषद आणि आयोजक यांच्यात सकारात्मक चर्चा
फिरोज मुलाणी / औंध :
कोरोना महामारीमुळे गेल्या वर्षी स्पर्धा झाली नाही. यंदा तरी स्पर्धा होणार किंवा नाही या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि सिटी कोर्पोरेशन यांच्यात स्पर्धा आयोजनाबद्दल सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच महाराष्ट्र केसरीचा आखाडा रंगणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही राज्यातील कुस्ती क्षेत्रातील सर्वोच्च मानाच्या किताबाची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद दरवर्षी या स्पर्धेचे आयोजन करीत असते. गेल्या वर्षी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शासनाने स्पर्धा आयोजनाला परवानगी दिली नसल्याने स्पर्धा रद्द करावी लागली होती. यंदा स्पर्धेसाठी कुस्तीगीर परिषदेने जिल्हानिहाय निवड चाचणीचे सोपस्कार पूर्ण केले आहे. मात्र मधल्या काळात ओमिक्रॉनचे संकट उभे राहिल्याने शासनाने निर्बंध वाढवले होते. त्यामुळे महाराष्ट्र केसरीची स्पर्धा यंदा होणार का नाही याबाबत मल्ल आणि कुस्ती शौकिनांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेऊन परिषदेचे पदाधिकारी आणि नामवंत मल्ल यांनी स्पर्धा घेण्याची मागणी केली होती. यामुळेच खा. शरद पवार यांनी राज्यातील कुस्तीशौकिनांना दिलासा देण्यासाठी स्पर्धा आयोजनासाठी पुढाकार घेतला होता. नुकतीच पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक सिटी कार्पोरेशनचे मालक अनिरुद्ध देशपांडे कुस्तीगीर परिषदेचे कार्यालयीन सचिव ललित लांडगे, मुख्य समन्वयक महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे, मुख्य समन्वयक महाराष्ट्र केसरी स्पर्धा चंद्रशेखर शिंदे यांच्यात बैठक पार पडली. या बैठकीत स्पर्धा आयोजनाबद्दल सकारात्मक चर्चा झाली त्यामुळे लवकरच महाराष्ट्र केसरीचा आखाडा रंगणार आहे. स्पर्धेची अधिक्रुत घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
स्पर्धेचा कार्यक्रम लवकरच जाहीर करु
कोरोनाचे निर्बंध आता शिथिल होऊ लागले आहेत. त्यामुळे कुस्तीगीर परिषद आणि सिटी कार्पोरेशन यांच्यात झालेल्या बैठकीत स्पर्धेबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. अनिरुद्ध देशपांडे यांनी स्पर्धा आयोजनाबद्दल अनुकुलता दर्शवली आहे. लवकरच संयुक्त बैठक घेऊन कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.
-ललित लांडगे कार्यालयीन सचिव
तरुण भारतचा बोलबाला
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत 25 जानेवारी रोजी तरुण भारतने वस्तुस्थिती मांडली होती. स्पर्धा व्हावी ही मल्ल आणि कुस्तीशौकिनांच्या मनातील भूमिका मांडून कुस्तीगीर परिषद आणि शासनाचे लक्ष वेधले होते पैलवानांच्या हितासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या तरुण भारतमधील त्या वृत्ताचा कुस्तीक्षेत्रात बोलबाला सुरू आह