जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक मलेरिया अहवाल-2019 नुसार जगातील 89 देशांत मलेरियाचे सुमारे 20 कोटी 28 लाखाहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत.
- 2018 मध्ये जागतिक पातळीवर या आजाराचे चार लाखांहून अधिक नागरिकांचे बळी गेले आहेत.
- दक्षिण पूर्व आशियातील एकूण तीन देशात मलेरियाचे एकुण 98 टक्के प्रकरणे समोर आली. त्यात एकटय़ा भारताची रुग्णांचे प्रमाण 58 टक्के होते.
- आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार लहान मुलांना मलेरियाची लागण सर्वाधिक होते. भारत सरकारने फेब्रुवारी 2016 मध्ये मलेरिया निर्मुलन 2016-2030 साठी राष्ट्रीय आराखडा तयार केला.
- त्याचबरोबर 2027 पर्यंत देशाला मलेरिया मुक्त करण्याचे ध्येय देखील ठेवण्यात आले आहे.
- पावसाळा हा आपल्याबरोबर मलेरियासारखा धोकादायक आजार घेऊन येतो.
- मलेरिया हा संक्रमित मादी अनाफिलिज डास चावल्याने होतो. ङडास चावल्याने पॅरासाईटला (विषाणू) शरिरात प्रवेश करण्याची संधी मिळते.
- हा विषाणू रक्तवाटे लिव्हरपर्यंत पोचतो. तेथे काही काळापर्यंत विकसित होतो आणि नंतर तो लाल रक्ताच्या पेशींना देखील बाधित करु लागतो.
- सर्वसाधारपणे मलेरियाचे लक्षणे दिसण्यासाठी दहा ते चार आठवडय़ांचा कालावधी लागतो.
- काही वेळा दीर्घकाळापर्यंत मलेरियाचे विषाणू हे शरिरात सुप्तावस्थेत राहतात.
मलेरिया रोखण्यासाठी उपाय
- मलेरिया रोखण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे वेक्टर नियंत्रित ठेवणे होय.
- मलेरियापासून बचाव करण्यासाठी डास होणार नाहीत, याची काळजी घ्यायला हवी.
- सपूर्ण बाह्या असलेले शर्ट घालावेत. मोकळ्या त्वचेच्या भागावर इन्सेक्ट रेपलेंटचा देखील वापर करु शकतो.
- दीर्घकाळापर्यंत बाहेर राहत असाल तर अधून मधून क्रीम लावत राहा.
- खूप पातळ कपडे घालू नयेत. कारण यातूनही डास चावू शकतात.
- डासांचे प्रमाण अधिक असेल तर रात्री झोपताना मच्छरदाणीचा उपयोग करावा. हा चांगला उपाय आहे.
- आपले घर आणि परिसरात स्वच्छता बाळगावी.
घराचे दरवाजे आणि खिडक्या मोकळ्या ठेवू नयेत.
- आपल्या लक्षणांवर लक्ष ठेवा. खूप ताप, थंडी वाजणे, हृदयाची धडधड वाढणे आदींकडे लक्ष या. मलेरिया असल्याचा संशय वाटताच तात्काळ डॉक्टराशी संपर्क करावा.
- डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मलेरिया विरोधक गोळ्यांचे सेवन करता येईल. साधारणपणे दोन आठवडय़ांपर्यंत गोळ्या घ्याव्या लागतात. रुग्णांनी औषधी घेण्यात निष्काळजीपणा दाखवू नये.