प्रतिनिधी / सांगली
आगामी काळात दिवाळीचा सण येत असून नागरिकांनी स्वत:हूनच मास्क वापरण्यास तसेच सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यास प्राधान्य द्यावे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता दुकानदारांनी स्वत:ची सुरक्षा लक्षात घेता मास्क वापरणाऱ्या ग्राहकांनाच खरेदीसाठी प्रवेश द्यावा. तसेच खरेदी करताना नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले.