प्रतिनिधी / सातारा
कोरोनाचा पुन्हा उदभव वाढू नये याकरता जिल्हाधिकाऱयांनी दिलेल्या सुचनेनुसार सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या मार्गदर्शनानुसार सातारा शहरात जे नागरिक मास्क वापरत नाहीत, सोशल डिस्टनस पाळत नाहीत. त्यांच्यावर कारवाई सुरु केली आहे. गेल्या सहा दिवसात सातारा पालिकेने तब्बल 13 हजार रुपयांचा दंड वसूल केल्याची माहिती पालिकेतून देण्यात आली.
जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सुचनेनुसार जिह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक वाढु नये यासाठी मास्क न वापरणाऱयावर कारवाई करण्यास ठिकठिकाणी प्रारंभ झाला आहे. सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनीही तशाच अतिक्रमण विभागास सुचना देताच अतिक्रमण विभागाचे प्रशांत निकम यांनी शहरात कारवाईला प्रारंभ केला. सातारा चिकन सेंटर येथे विना मास्कची कारवाई करुन 4 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच शहरात दि.26 ते दि. 3 या दिवसात 13 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.