महापालिका अग्निशमन दलाचे यांत्रिक बोटीच्या सहाय्याने रेस्क्यू
प्रातिनिधी/मिरज
मिरज कृष्णाघाट, हुलवान मळा येथील महाराष्ट्र फार्म हाऊसमध्ये नदीच्या पाण्याच्या वेढ्यात अडकलेल्या 8 नागरीकांना रेस्क्यू करत महापालिका अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. कृष्णाघाट येथे पाण्याची पातळी 57 फुटावर पोहचली आहे. त्यामुळे आसपासच्या शेतात असणाऱ्या वाड्या वस्तीमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.
हुलवान मळा येथे पूरच्या पाण्यात अडकलेल्या 8 नागरीकांना यांत्रिक बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. अग्निशमन दलाच्या पथकाने यांत्रिक बोटीच्या सहाय्याने हे रेस्क्यू केले. यावेळी फायर ऑफिसर सुनील माळी, वाहन चालक भरत माळवदे, देविदास मानकरी, प्रकाश चव्हाण, प्रल्हाद सुतार, सागर भातमारे, अविनाश चाळके ,लिंगप्पा कांबळे यांच्यासह आदी कर्मचाऱ्यांनी 8 नागरिकांना सुरक्षित रित्या बाहेर काढले.