खानापूर रेल्वेस्टेशनची नवी इमारत : पण असोगा रस्त्यावरील भुयारी मार्गाचे घोडे अडले कुठे : विद्युतीकरण कामालाही गती
प्रतिनिधी / खानापूर
लोंढा-मिरज दुपदरी रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असून 2022 पर्यंत सदर मार्गाचे काम करण्याचा रेल्वे विभागाने संकल्प केला आहे. हा रेल्वेमार्ग आता दुपदरीकरण होत असल्याने खानापूरच्या रेल्वेस्टेशनची नवीन इमारत बांधली जात आहे. ते काम आता पूर्णत्वाकडे पोहचत आहे. तसेच आणखी एक रेल्वे लाईन घालण्यासाठी जमीन सपाटीकरणाचे कामही जवळजवळ पूर्णही झाले आहे. पण रेल्वे स्टेशनचे काम सुरू असले तरी खानापूर-असोगा मार्गावरील रेल्वे फाटकाजवळ भुयारी मार्ग करणे अत्यंत गरजेचे असून यासंदर्भात रेल्वे विभागाकडून अद्याप कोणत्या हालचाली दिसत नसल्याने भुयारी रेल्वेमार्गाचे नेमके काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लोंढा ते खानापूर रेल्वे स्टेशन दरम्यान दुहेरी रेल्वेलाईन घालण्यासाठी येणाऱया छोटय़ा-मोठय़ा नदी नाल्यांवर पुलांची कामेही जोरात सुरू आहेत. त्यामध्ये खानापूर रेल्वे स्टेशनजवळील नाल्यावरच्या पुलाचे काम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. या पुलाला पूर्वीपासून काळा पूल या नावाने ओळखले जाते. तर दुहेरी रेल्वेलाईनसाठी आवश्यक असलेल्या मलप्रभा नदीवरील पुलाचे कामही सुरू आहे. या पुलाला पूर्वीपासून तांबडा पूल या नावाने ओळखले जाते. खानापूर रेल्वे स्थानकावर आता दुहेरी रेल्वे लाईनमुळे दोन प्लॅटफार्म होणार आहेत. एका प्लॅटफार्मवरून दुसऱया प्लॅटफार्मवर जाण्यासाठी रेल्वे स्टेशन अंतर्गत उड्डाणपुलाचे बरेच कामही झाले आहे. याशिवाय आता लोंढाöमिरज दुहेरी रेल्वेमार्गाबरोबरच विद्युतीकरणही होणार आहे. यासाठी लोंढा ते खानापूर दरम्यान विद्युतखांबही उभारण्यात आले असून आता वीजवाहिन्या ओढण्याचे काम शिल्लक आहे. तसेच वीजपुरवठय़ासाठी खानापूर रेल्वे स्थानकाजवळ पॉवर स्टेशनही बांधण्यात आले आहे. यामुळे आता खानापूर रेल्वेस्थानक परिसराचा चेहरामोहराच बदलणार आहे.
एकीकडे रेल्वे स्थानकाच्या विकासाचे तसेच दुहेरी रेल्वेमार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी असोग्याला जाण्यासाठी आवश्यक असलेल्या भुयारी पुलाच्या कामाबद्दल मात्र कोणतीच हालचाल दिसत नाही. खानापूर-असोगा रस्त्यावर रेल्वेलाईन ओलांडून जाण्यासाठी पूर्वीपासून रेल्वे फाटक बसवण्यात आले आहे. पूर्वी रेल्वे फाटक रेल्वेस्टेशन जवळच होते. पण 25 वर्षापूर्वी लेंढा-मिरज मिटरगेज मार्गाचे रुपांतर ब्रॉडगेजमध्ये झाल्याने खानापूर रेल्वे स्टेशनची लांबीही वाढली. साहजिकच रेल्वे फाटक स्टेशनपासून बऱयाच अंतरावर गेले. सध्या या फाटकाकडूनच खानापूर-असोगा मार्गावर वाहतूक सुरू असते. रेल्वे येण्याच्या वेळी फाटक बंद करण्यात येते. तसेच रेल्वे गेले की, पुन्हा उघडले जाते. सदर मार्गावर कायमस्वरुपी भुयारी मार्ग करावा, अशी बऱयाच वर्षापासूनच मागणी होती. यासाठी वेळोवेळी निवेदनेही देण्यात आली. यामुळे रेल्वे विभागाने भुयारी मार्गाला मंजुरी दिली. त्याचे प्रत्यक्षात कामही सुरू झाले. पण यासाठी निवडलेली जागा चुकीची होती. यामुळे खानापूर-असोगा मार्गाचे अंतरही वाढणार होते. शिवाय ज्या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यात येणार होता. त्याच्याजवळच एक नाला आहे. यामुळे पावसाळय़ात त्या ठिकाणी पाणी असते. साहजिकच त्या ठिकाणा भुयारी मार्ग झाला असता तर पावसाळय़ात दोन-तीन महिने खानापूर-असोगा मार्गावरील वाहतुकीला मोठी अडचण निर्माण झाली असती. यामुळे त्या ठिकाणी भुयारी मार्ग करण्यास विरोध करण्यात आला. त्या ठिकाणचे काम बंद करून ज्यावेळी मीटरगेज असताना ज्या ठिकाणी रेल्वे फाटक होते. त्या ठिकाणी भुयारी मार्गासाठी योग्य जागा असल्याने त्याच ठिकाणी भुयारी मार्ग करावा, अशी मागणी करण्यात
आली.
भुयारी मार्गाचे काम त्वरित पूर्ण करा
यासंदर्भात तत्कालीन आमदार प्रल्हाद रेमाणी यांनी हुबळी येथे रेल्वे विभागाच्या अधिकाऱयांची भेट घेऊन त्यांना निवेदनही सादर केले होते. रेल्वे विभागाने याची दखल घेऊन दोनच दिवसात रेल्वेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आपल्या अभियंत्यांना खानापूरला पाठवून भुयारी मार्गासाठी अन्य जागेची पाहणी केली. त्यावेळी सर्व बाजूनी विचार करून आता असलेले रेल्वेगेट तसेच मीटरगेज असताना ज्या ठिकाणी रेल्वेगेट होते. त्या दोन्ही गेटच्या मधली जागा यासाठी निश्चित करण्याता आली. व त्या जागेवर भुयारी मार्ग करून देण्याचे आश्वासन रेल्वे विभागाने दिले होते. यानंतर काही महिन्यांनी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी खानापूर रेल्वेस्थानकाच्या तपासणीसाठी आले होते. त्यावेळी देखील खानापूर-असोगा रस्त्यावर रेल्वेलाईनच्या ठिकाणी भुयारी मार्गाचे काम त्वरित सुरू करावे, अशा मागणीचे निवेदन असोगा, मन्सापूर, कुटीन्होनगर, भोजगाळी ग्रामस्थांनी त्या अधिकाऱयांना दिले होते. तसेच ग्रामस्थानी त्यांच्याबरोबर या संदर्भात सविस्तर चर्चाही केली. त्या अधिकाऱयांनी भुयारी मार्गाचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले. पण आश्वासनालाही सहा वर्षे ओलांडून गेली. पण अद्याप त्याची पूर्तता झालीच नाही.
त्यातच आता लोंढा-मिरज दुहेरी रेल्वे मार्गाबरोबरच या मार्गाच्या विद्युतीकरणाचे कामही सुरू झाले आहे. ही दोन्ही कामे 2022 पर्यंत पूर्ण होणार असून यानंतर लोंढा-मिरज मार्गावरील रेल्वे सेवेमध्ये बरीच वाढ होणार आहे. दिवसाकाठी कमीतकमी 20 रेल्वेगाडय़ा तरी या मार्गावरुन ये-जा करण्याची शक्यता आहे. अशावेळी खानापूर-असोगा मार्गावरील रेल्वेफाटक पूर्णपणे बंद होण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे त्या पूर्वीच खानापूर-असोगा मार्गावरील रेल्वे लाईनजवळील भुयारी मार्गाचे कामही पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. त्यासाठी रेल्वे विभागाने याची तातडीने दखल घेऊन दुहेरी रेल्वे मार्ग सुरू होण्यापूर्वीच भुयारी मार्गाचेही काम पूर्ण करावे, अशी मागणी केली जात आहे.
20 फूट उंचीचा भूयारी मार्ग करा
लोंढा-बेळगाव मार्गावरील खानापूरचे पोलीस ट्रेनिंग सेंटर, हत्तरगुंजी मार्ग, इदलहोंड-गर्लगुंजी मार्गावरील रेल्वेफाटक बंद करून त्या ठिकाणी या आधीच भुयारी मार्ग काढण्यात आले आहेत. पण त्या मार्गाची उंची 15 फूट उंच आहे. त्या मार्गावरून वीट वाहतूक मोठय़ा प्रमाणात होते. पण 15 फूट उंचीचा मार्गावरून वीट, वाळू वाहतूक करणारी वाहने अत्यंत सहजपणे पार होतात. पण असोगा परिसरात उसाचे कार्यक्षेत्र मोठय़ा प्रमाणात आहे. यामुळे साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाच्या काळात खानापूर-असोगा मार्गावरून उसाची वाहतूकही मोठय़ा प्रमाणात असते. पण 15 फुटी उंचीच्या भुयारी मार्गातून ऊस ट्रक वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो. यामुळे सदर मार्गावर 15 ऐवजी 20 फूट उंचीचा भुयारी मार्ग करावा, अशी असोगा, मन्सापूर, कुटीन्होनगर, भोजगाळी परिसरातील जनतेची मागणी आहे.