स्त्री शक्तीची उपासना केल्या जाणाऱया नवरात्रोत्सवात ‘तरुण भारत’ने ‘मी ऊर्जिता’च्या सहप्रायोजकत्वाने महिलांना नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिले. फेसबुक, इन्स्टाग्राम, यु-टय़ूब या सोशल मीडियाच्या माध्यमांवर दररोज आमचे फोटो झळकले. शिवाय वृत्तपत्रातही आमचा फोटो प्रसिद्ध झाला. या उपक्रमाने आम्हाला नवीन ऊर्जा मिळाली. त्यामुळे ‘तरुण भारत’बद्दल कृतज्ञ आहोत. महिलांसाठी असेच उपक्रम यापुढेही आयोजित करावेत, अशी अपेक्षा ‘मी नवदुर्गा’ उपक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केली.
‘मी नवदुर्गा’अंतर्गत व्यक्तिगत एक महिला व दहा जणींच्या गटाने आपला फोटो दररोज ‘तरुण भारत’कडे पाठवावयाचा होता. ते फोटो दररोज ‘तरुण भारत’च्या फेसबुक, इन्स्टा आणि यु-टय़ूबवरून प्रसारित करण्यात आले. दसऱयानंतर लगेचच ‘तरुण भारत’च्या अंकामध्येही सर्वोत्कृष्ट फोटो प्रसिद्ध करण्यात आले. यामधील सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट आणि सहभागी सर्वांना ‘तरुण भारत’तर्फे खास बक्षिसे देण्यात आली. त्यावेळी महिलांनी उपरोक्त भावना व्यक्त केल्या.
निपाणी
नारीशक्ती महिला मंडळ, निपाणी, जि. बेळगाव
राजश्री चव्हाण, अश्विनी कुंभार, सुजाता सौंदलगेकर, रोहिणी लिगाडे, सोनाली तिबिले, सुरेखा नार्वेकर, राजश्री कुंभोजे यांच्यासह भानुदास कोंडेकर, उत्तम सुर्यवंशी.
‘तरुण भारत’चे आवाहन वाचताक्षणीच आम्ही यामध्ये सहभागी होण्याचे ठरविले. आम्हाला ‘तरुण भारत’ने व्यासपीठ तर दिलेच, पुन्हा बक्षिसे देऊन गौरव केला, ही बाब आमच्यासाठी खूप प्रेरणादायी होती. या उपक्रमाने आम्हाला एक वेगळाच अनुभव दिला. पुढील वषी अधिक तयारी करू, अशी ग्वाही निपाणीच्या नारीशक्ती व जिजामाता महिला मंडळाच्या महिलांनी दिली.
नारीशक्ती महिला मंडळाच्या राजश्री चव्हाण, सुजाता सौंदलगेकर, रोहिणी लिगाडे, सोनाली तिबिले, अश्विनी कुंभार, सुरेखा नार्वेकर, राजश्री कुंभोजे यांचा यामध्ये सहभाग होता. जिजामाता मंडळामध्ये अध्यक्षा संजीवनी पावले, सदस्या अंजली पोतदार, दीपाली मोहिते, दीपा लाटकर, गायत्री डोंगरमाने, सोनिया तिळवे, रुपाली व सिद्धी जासूद यांचा सहभाग होता. निपाणी कार्यालयाचे उपसंपादक भानुदास कोंडेकर, जाहिरात प्रतिनिधी उत्तम सूर्यवंशी व अन्य सदस्यांच्या उपस्थितीत त्यांना गौरविण्यात आले.
जिजामाता भगिनी मंडळ…
मी नवदुर्गा या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या जिजामाता भगिनी मंडळाच्या अध्यक्षा संजिवनी पावले, सदस्या अंजली पोतदार, दीपाली मोहिते, दीपा लाटकर, गायत्री डोंगरमाने, सोनिया तिळवे, रुपाली जासुद, सिद्धी जासुद यांना प्रमाणपत्र व बक्षिस देऊन गौरविण्यात आले.
बेळगाव
राजश्री चौगुले व संजय चौगुले, क्लब रोड, बेळगाव यांच्यासह संपादक जयवंत मंत्री, व्यवस्थापक गिरीधर रवी शंकर, एच आर संतोष घोरपडे, जाहिरात प्रतिनिधी अमित कोळेकर
लहानपणापासूनच काहीतरी वेगळे करण्याची आवड होती. लग्नानंतर पतीची समर्थ साथ मिळाल्याने सर्व आवड व छंद जोपासता आले. सर्व कामे उरकून दुपारी दोननंतर मी स्वतः तयार होऊन फोटो पाठवत होते. एक हौस म्हणून मी या उपक्रमात सहभागी झाले. ‘तरुण भारत’ने येथे बोलावून सत्कार केल्याचा तर विशेष आनंद आहे, असे मत राजश्री चौगुले यांनी व्यक्त केले.
यांचे विशेष कौतुक म्हणजे फोटो काढण्यासाठी दुसरी व्यक्ती घरी नसल्याने टायमर लावून त्यांनी आपले फोटो काढले आणि नऊ दिवसांच्या रंगानुरुप साडी नेसून देवीच्या रूपानुसार रंगभूषा करून त्या पाठवत होत्या.
त्या म्हणाल्या, पती संजय चौगुले हे ऑफिसला जाण्यापूर्वी सर्व तयारी करून जात. 8 दिवस घेतलेल्या मेहनतीमुळे हे बक्षीस मिळू शकले. यामुळे एक आत्मविश्वास निर्माण झाला असून, पतीच्या प्रोत्साहनामुळे हे बक्षीस मिळविल्याचे त्यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले.
‘तरुण भारत’चे संपादक जयवंत मंत्री यांच्या हस्ते राजश्री चौगुले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यवस्थापक गिरीधर रवी शंकर, पत्रकार मनीषा सुभेदार, एच. आर. विभागप्रमुख संतोष घोरपडे, जाहिरात प्रतिनिधी अमित कोळेकर यासह इतर उपस्थित होते.
मी नवदुर्गा उपप्रमांतर्गत सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट व सहभाग अशा क्रमवारीने बक्षिसे देण्यात आली. ज्या महिला मंडळांनी नवरात्रीतील नऊ दिवसांचे नऊ रंग व देवीची शैलपुत्री ते सिद्धीदात्री यांच्या रुपांचा अभ्यास करून त्याप्रमाणे ती देवी साकारण्याचा प्रयत्न केला, या निकषांवर मूल्यांकन करून त्यांना बक्षिसे देण्यात आली. दरम्यान, या उपक्रमात सहभागी झाल्याबद्दल इतरांना प्रमाणपत्राबरोबर उत्तेजनार्थ बक्षिसेही देण्यात आली.
गोवा
सहभाग – विठ्ठल रखुमाई बचत गट, रायबंदर, पणजी, गोवा
पूजा हळदणकर, दीक्षा नाईक, विलासिनी रायकर, दीप्ती नाईक, लक्ष्मी गोवेकर, अस्मिता नाईक, शांती हळदणकर, अश्विनी नाईक, विजया नाईक, प्रज्ञा नाईक.
नवरात्रीचे औचित्य साधून ‘तरुण भारत’च्या सोशल मीडियाने समाजापर्यंत पोहोचण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. याचा आम्हाला आनंद आहे, असे विठ्ठल-रखुमाई बचत गटाच्या अध्यक्षा पूजा हळदणकर यांनी सांगितले.
पणजी कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर, जाहिरात विभागाचे प्रमुख रवी पाटील, शंकर जाधव, रितेश देसाई उपस्थित होते. त्यांच्या हस्ते बचत गटाच्या महिलांना बक्षिसे देण्यात आली. या माध्यमातून आम्ही अनेक लोकांशी जोडलो गेल्याची भावना उपाध्यक्षा अश्विनी नाईक यांनी व्यक्त केली.
प्रत्येक स्त्री ही नवदुर्गाच आहे. ती कुटुंब आणि संसार व कामाचा व्याप सांभाळून पुढे जाते. तुम्ही आधुनिक युगातल्या नवदुर्गाच आहात, असे मत ‘तरुण भारत’ गोवा आवृत्तीचे संपादक सागर जावडेकर यांनी व्यक्त केले.
कोल्हापूर
भगिरथी महिला संस्था, कावळा नाका – कोल्हापूर
अरुंधती धनंजय महाडिक, शरयू भोसले, सुषमा पाटील, संगीता खाडे, शिवानी पाटील, सविता कोळी, अश्विनी पंडित, शोभा कोळी, दीपा पाटील, शारदा पोटे यांच्यासह मनोज साळुंखे.
प्रा. डॉ. सिंधू आवळे,राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कोल्हापूर यांच्यासह तरुण भारत कोल्हापूरचे निवासी संपादक मनोज साळुंखे.
कोल्हापूरमध्ये भागिरथी महिला संस्थेच्या सदस्यांना निवासी संपादक मनोज साळुंखे, जाहिरात व्यवस्थापक मंगेश जाधव, मुख्य प्रतिनिधी संजीव खाडे, प्रशासन अधिकारी राहुल शिंदे, सोशल मीडियाप्रमुख राहुल गडकर, प्रतिनिधी अहिल्या परकाळे यांच्या हस्ते बक्षिसे आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
या उपक्रमाने आम्हाला ऊर्जा दिली. शिवाय आम्हाला बक्षिसे देऊन आमचा आनंद ‘तरुण भारत’ने द्विगुणित केला आहे, असे संगीता खाडे म्हणाल्या. शरयू भोसले यांनी हा उपक्रम स्वागतार्ह असून ‘तरुण भारत’ने महिलांना कायद्याबाबत माहिती देऊन जागरुक करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘मी ऊर्जिता’च्या माध्यमातून ‘तरुण भारत’ने खाद्यसंस्कृती, सांस्कृतिक व सामाजिक चालीरीतींची माहिती देण्याची अपेक्षा शिवानी पाटील, शाहू कॉलेजच्या डॉ. सिंधू आवळे यांनी व्यक्त केली. या उपक्रमामुळे परराज्यांतील संस्कृतीची माहिती मिळाली, असे सविता कोळी यांनी सांगितले. संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.