ऑनलाईन टीम / मुंबई
डिसेंबर महिन्यात पाऊस पडताना आपण कधी पाहिलंच नसेल मात्र अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा यामुळे जमा झालेले कोकण किनारपट्टीसह राज्याच्या पठारीभागात ढगाळवातावरण निर्माण आहे. मुंबई, पुणे आणि कोकण किनारपट्टीच्या अनेक भागांमध्ये बुधवार सकाळपासूनच पावसाची संततधार सुरु आहे. मुंबई मुख्य शहरांबरोबरच उपनगरांमध्येही सकाळपासूनच ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरु आहे.
हवामान खात्याकडून दिलेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास रायगड, पालघर, मुंबई, ठाणे, पुणे आणि सातारा जिल्ह्यामधील काही ठिकाणी सौम्य स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यात आहे. सकाळी ११ च्या सुमारास हा इशारा देण्यात आला असून तो पुढील तीन ते चार तासांसाठी देण्यात आलाय. गेले काही दिवस राज्यातील पडणाऱ्या पावसाच्या हजेरीमुळे गळीत हंगात सुरु असणारी ऊस तोडीला अडचणीचे ठरत आहे. तसेच नाचणी, भात पिक यांच्या काढणीला ही व्यत्यय येत आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस म्हणजेच १ डिसेंबर ते ३ डिसेंबरदरम्यान राज्याच्या अनेक भागांत जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ४८ तासांत त्याची तीव्रता वाढणार आहे. त्यामुळे पालघर, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड अशा विविध ठिकाणी पुढील तीन दिवस पावसाची शक्यता आहे.