पक्षातील नेत्यांवर टीका केल्यास कारवाई केली जाणार
बेंगळूर/प्रतिनिधी
भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा प्रभारी अरुण सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाने विजयपूरचे आमदार बसणगौडा पाटील यत्नाळ यांना नोटीस बजावली आहे. शिस्त समिती या संदर्भात निर्णय घेईल. दरम्यान यत्नाळ यांनी मुख्यमंत्र्यांवर वारंवार टीका केली आहे. अलीकडेच त्यांनी मे पर्यंत मुख्यमंत्री बदलतील असे वक्तव्य केले होते.
अरुण यांनी पक्षातील कोणत्याही व्यक्तीने टीका केल्यास सहन केले जाणार नाही. भाजप हा एक शिस्तबद्ध आणि लोकशाही पक्ष आहे. शिस्त समितीच्या अहवालाच्या आधारे यत्नाळ यांना पक्षातून हकालपट्टी करण्याची कारवाई केली जाईल.
अरुण यांनी यत्नाळ यांचे विधान पक्षाच्या हिताचे नव्हते. यत्नाळ यांचे नाव न घेता अरुण म्हणाले की मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा सरकारचे नेतृत्व करतील आणि जर कोणी बदलांविषयी बोलत असेल तर ते फक्त स्वप्न पाहत आहेत. ग्रामविकास मंत्री के.एस. ईश्वरप्पा यांनी राज्यपालांना पत्राबाबत विचारले असता अरुण म्हणाले की, मंत्र्यांना पत्र लिहण्याऐवजी मुख्यमंत्र्यांशी बोलून मंत्र्यांनी प्रश्न सोडवायला हवा होता.