मगो नेते सुदिन ढवळीकर यांचा इशारा
प्रतिनिधी/ वाळपई
कर्नाटक सरकारने म्हादई नदीवर घाला घालण्याचा केलेला प्रयत्न व सरकारने आतापर्यंत या विषयावर केलेले राजकारण याच्या पार्श्वभूमीवर आता गोमंतकीयांनी जागृत होणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा येथील जैवविविधता व माणसांचे अस्तित्वच पूर्णपणे नष्ट होण्याची भीती आहे. म्हादईच्या रक्षणासाठी सरकारने पुढाकार घेतल्यास मगो व इतर सर्व पक्ष सरकारच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहेत. मात्र त्यांनी राजकारणाची गणिते मांडण्याचा प्रयत्न केल्यास जनता त्यांना निश्चितपणे धडा शिकवेल, असा इशारा उपमुख्यमंत्री व माजी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी दिला आहे.
महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातर्फे म्हादई बचाव जनजागृती अभियानाला काल रविवारी सत्तरी तालुक्मयातील उस्ते येथे कळसा-भांडुरा नदीचा प्रवाह म्हादईला मिळतो त्याठिकाणी जलपूजन व सार्वजनिक गाऱहाणे घालून सुरुवात करण्यात आली. ‘आमची म्हादय, आमका जाय’ अशा घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. सुमारे पाऊण तास चालत जाऊन कळसा-भांडुरा नदीचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणचे सर्वांगसुंदर चित्र पाहण्याची संधी गोव्याच्या वेगवेगळय़ा भागातून उपस्थित असलेल्या म्हादईप्रेमींना मिळाली. यावेळी उपस्थितांनी म्हादईप्रेमींनी नदीचे संरक्षण करण्याची प्रतिज्ञा घेतली. शंखनाद, आरती, जलपूजन करून या अभियानाला प्रारंभ करण्यात आला.
जावडेकर यांच्याकडून निवडणुकीचे राजकारण
मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी यापूर्वी सर्वपक्षीय शिष्टमंडळ दिल्लीला नेले होते. त्यावेळी वन व पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कर्नाटक सरकारला कळसा-भांडुरा प्रकल्प उभारण्यासाठी दिलेला परवाना मागे घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या संदर्भाचा पाठपुरावा न झाल्यामुळे आपण एक महिन्यानंतर या संदर्भाची वाच्यता केली. मात्र पुन्हा एकदा एक महिना थांबा अशाप्रकारचे वक्तव्य करून जावडेकर यांनी राजकारण केले. कर्नाटक राज्यातील पोटनिवडणुका लक्षात ठेवून त्यांनी घाणेरडे राजकारण केलेले आहे, असेही ढवळीकर म्हणाले.
यापुर्वीही कर्नाटकला गोव्याने केला होता विरोध
म्हादई नदीच्या अस्तित्वासंदर्भात 2007 पूर्वीच्या सरकारने आपल्यापरीने महत्त्वाचे योगदान दिले होते. 1973 सारी मगो पक्षाच्या सरकारने या संदर्भात नदीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास कर्नाटक सरकारला पूर्णपणे बंदी घातली होती. त्यानंतर 1980 ते 1989 पर्यंत तत्कालीन मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनीही केंद्र सरकारला म्हादईचे पाणी कोणत्याही परिस्थितीत वळवू देणार नसल्याचा इशारा दिला होता. रवी नाईक व बार्बोझा सरकारने यासंदर्भात गंभीर धोरण स्वीकारले होते. 1999 तत्कालीन जलसिंचनमंत्री दयानंद नार्वेकर यांनी कडक पत्र लिहून केंद्र सरकारला म्हादई पाणी वळविण्यास विरोध दर्शवला होता.
जनता सरकारला धडा शिकवील
कर्नाटक सरकारने 2007 नंतर पुन्हा एकदा या संदर्भात हालचाली केल्यानंतर जलतंटा लवादाने गोव्याच्या बाजूने निकाल दिला असतानाही केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी दिलेला परवाना म्हणजे गोमंतकीयांच्या अस्तित्वावर घाला घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप ढवळीकर यांनी केला आहे. यासंदर्भात गोवा सरकारच्या यंत्रणेने गांभीर्याने लक्ष न दिल्यास जनता निश्चितपणे या सरकारला धडा शिकवील, असा इशाराही त्यांनी दिला.
… तर दक्षिण काशीची वाळवंटी होणार
गोवा ही दक्षिणेतील काशी असल्याचे मानण्यात येत आहे. म्हादई नदीच्या अस्तित्वावर गोमंतकाची धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरणीय, कृषी संस्कृती पूर्णपणे विसंबून राहिलेली आहे. पाणी कर्नाटक सरकारने वळविल्यास गोमंतकात हाहाकार निर्माण होण्याची भीती आहे. यामुळे आतापर्यंत दक्षिण काशी अशी ओळख निर्माण झालेल्या गोव्याची वाळवंटी काशी होण्यास अजिबात वेळ लागणार नाही, असेही ढवळीकर म्हणाले.
जनजागृती सर्व मतदारसंघांमध्ये होणार
गोमंतकीयांना या नदीचे अस्तित्व खऱयाअर्थाने समजावे यासाठी सुरू करण्यात आलेले म्हादई बचाव जनजागृती अभियान सर्वच मतदारसंघांमध्ये जाणार असून यात गोव्यातील म्हादईप्रेमी विविध संस्थांच्या माध्यमातून सहकार्य करणार आहेत. गोमंतकीयांनी या प्रश्नावर कोणत्याही प्रकारचे राजकीय व वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकाद्या विचारधारेखाली एकसंघ होणे आता काळाची गरज बनल्याचे ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
नदीचे पाणी आटल्यास समुद्राची क्षारता वाढणार : सावळ
म्हादई नदीचे अस्तित्व येणाऱया काळात किती महत्त्वाचे आहे, यासंदर्भाची माहिती अजूनही गोमंतकीयांना माहीत नाही. म्हादई नदीच्या पाण्यावर गंभीर परिणाम झाल्यास समुद्रावर विपरीत परिणाम होऊ शकतात. गोडय़ा पाण्याचा प्रवाह कमी झाल्यास समुद्रातील क्षारता वाढण्याची शक्मयता असून तसे झाल्यास समुद्राचे पाणी अनेक ठिकाणी घुसण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. तसे झाल्यास या भागातील शेती व जैवविविधता पूर्णपणे नष्ट होण्याची भीती महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष व माजी आमदार नरेश सावळ यांनी केले आहे.
… तर पाणीबाणी निर्माण होणार
आज गोव्यामध्ये विविध नद्यांच्या माध्यमांतून जलसमृद्धी आहे. यात म्हादई नदीचे योगदान महत्त्वाचे आहे. कर्नाटक सरकारला पाणी वळवू देण्यास परवानगी दिल्यास गोव्यामध्ये पाणीबाणी समस्या निर्माण होणार आहे. या नदीच्या अस्तित्वासाठी सुरू करण्यात आलेले आंदोलन फक्त मगो पक्षातपुरतेच मर्यादित राहिलेले नाही, असेही सावळ म्हणाले.
किशोर भावे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेले जलपूजन शंखवादन या अभियानाचे वैशिष्टय़ ठरले. मंत्रपठण पूजाअर्चा यामध्ये माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही सक्रियपणे सहभाग दर्शविला होता. त्यानंतर जलमातेची आरती व विविध प्रकारच्या आरत्या करण्यात आल्यानंतर वेगवेगळय़ा घोषणांनी परिसर अत्यंत दुमदुमून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले. निसर्गाच्या सानिध्यात व म्हादई नदीच्या काठावर अत्यंत उत्साही वातावरणात या अभियानाला प्रारंभ झालेला असून हा उत्साह शेवटपर्यंत निश्चितच टिकेल अशा प्रकारची आशा व्यक्त करण्यात आलेली आहे.
पक्षाचे नेते दीपक ढवळीकर, अँड. नारायण सावंत, प्रताप फडते, डॉ. केतन काटीकर, जिल्हा पंचायत सभासद बबिता गावकर, जिल्हा पंचायत सभासद शिवदास गावडे, जिल्हा पंचायत सभासद चित्रा फडते, कृष्णनाथ दिवकर अँड. सत्यवान पालकर, अभय प्रभू, कवळे सरपंच राजेश कवळेकर, सरपंच सरोज नाईकर, गोवा सुरक्षा मंचचे प्रेमानंद महांबरे, हदयनाथ शिरोडकर व इतरांची खास उपस्थित होते. सार्वजनिक गाऱहाणे उदय बर्वे यांनी सांगितले.