प्रतिनिधी/ म्हापसा
राज्यात अडकलेल्या 63 विदेशी पर्यटकांची रवानगी शनिवारी सकाळी तीन विशेष बसनी मुंबईत करण्यात आली. म्हापसा येथे या एकूण 63 ही पर्यटकांची म्हापशाच्या आरोग्य केंद्राच्या खास डॉक्टरकडून तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर त्यांना बसने पाठविण्यात आले.
कोरोनामुळे राज्यात जनता करफ्यू आणि त्यानंतर लॉकडाऊन झाल्याने राज्यात अनेक विदेशी नागरिक अडकून पडले होते. त्यांना आपापल्या राज्यात परत पाठविम्याची जबाबदारी राज्य सरकारने घेतल्याने थोडय़ा थोडय़ा विदेशी नागरिकांना आपल्या गावी पाठविले जात आहे. याचाच एक भाग म्हणून म्हापशातून अमेरीका देशातील 63 विदेशी नागरिकांना परत पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली.