कोरोना संकटाच्या धास्तीने पालकवर्गाची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
यावषीच्या दहावी परीक्षेला विद्यार्थ्यांना दुसऱया शाळांमध्ये अथवा परीक्षा केंद्रांमध्ये न पाठविता त्यांच्या त्यांच्या शाळेमध्येच परीक्षा घ्याव्यात. कोरोनाचे संकट अद्याप टळले नाही. परीक्षेला बसणाऱया लाखो विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता एकाला जरी संसर्ग झाला तरी तो वाढू शकतो. त्यामुळे यंदाच्या वषी विद्यार्थ्यांच्या शाळांमध्येच दहावीची परीक्षा घ्यावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
सरकारने एलकेजीपासून महाविद्यालयापर्यंत सर्व वर्ग अद्याप सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही. लहान मुलांचा विचार करून शाळासुद्धा 1 ऑगस्टनंतरच सुरू कराव्यात, या मागणीचा विचार करून सरकारने सध्या तरी शाळा सुरू करण्यास हिरवा कंदील दाखविलेला नाही. प्रत्येक पालकाला त्यांच्या मुलांची चिंता असते. कोरोनामुळे यंदा या चिंतेत भर पडली आहे. त्यामुळे पालक आपल्या मुलांना दुसऱया परीक्षा केंद्रांवर पाठविण्यास इच्छुक नाहीत.
दुसऱया केंद्रांवर पाठविले नाही तर परीक्षा बुडते आणि परीक्षेला पाठविल्यास कोरोनाच्या धास्तीची टांगती तलवार घेऊन वावरावे लागते. अशा द्विधा मनस्थितीत पालक सापडले आहेत. त्यामुळे सरकारने सर्व पालकांच्या मनस्थितीचा विचार करून यावषी दहावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या शाळांमध्येच घेण्यास मुभा द्यावी, अशी मागणीही पालक करीत आहेत.
याबाबत बेळगावमधील विविध शाळांमध्ये असणाऱया विद्यार्थ्यांचे काही पालक एकत्र आले आहेत. एसएसएलसीला बसणाऱया सर्वच मुलांच्या पालकांनी एकत्रितपणे याबाबत सरकारवर दबाव आणल्यास सरकार नक्कीच विचार करू शकते. त्यामुळे सरकारने ज्या शाळांमध्ये विद्यार्थी आहेत, त्या शाळांमध्येच परीक्षा केंद्र करावे. कॉपी किंवा तत्सम प्रकार टाळण्यासाठी बाहेरील परीक्षक नेमावेत, अशी मागणीही पालकांनी केली आहे.
पालकांना आवाहन
बेळगावमधील ज्या पालकांची मुले यंदा दहावी परीक्षेला बसणार आहेत, त्या सर्वांच्या पालकांनी याबाबत विचारविनिमय करणे आवश्यक आहे. या प्रश्नावर काही पालकांनी पुढाकार घेतला असून अन्य पालकांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना आपले मत कळविणे आवश्यक आहे. यासाठी गणपत गडकरी 9632458900, दीपक खंडागळे 9845562966, विनोद राजोरे 9342321673, राजू पोटे 9353361373 यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.