रत्नागिरीची मुग्धा पानवलकर-जोग दोन दशकांपासून दोहा येथे वास्तव्यास
मीरा पोतदार/ चिपळूण
फेब्रुवारीच्या अखेरीस कोरोनाने कतारमध्ये प्रवेश केला आणि काही दिवसातच आक्राळ-विक्राळ स्वरूपात त्याने हातपाय पसरले. सध्या देशात साडेपाच हजारांहून अधिक कोरोना रूग्ण आहेत. मात्र येथील सरकारने कोरोना विरोधातील लढाईत सक्षम व ठोस पावले टाकली असून कर्मभुमीत सुरक्षीततेचा अनुभव आम्ही घेत आहोत. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या गीतांच्या ओळींचा कोरोनाच्या निमित्ताने नव्याने अर्थ उलगडत असल्याचे मुळ रत्नागिरीच्या मुग्धा मनोज पानवलकर पूर्वाश्रमीची संगीता वसंत जोग यांनी सांगितले. दोन दशकांपासून त्या कुटुंबासोबत कतारमधील दोहा येथे वास्तव्यास आहेत.
मुग्धा यांचे अगदी शाळेपासून कॉलेजच्या शेवटच्या वर्षापर्यंतचे शिक्षण सर्व रत्नागिरीतच… 1996 साली मनोज पानवलकर यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. लग्नाआधी मनोज कुवेतमध्ये होते. 1997 साली कतारला Qatar Petroleum या सरकारी कंपनीमध्ये रुजू झाले.. तेव्हापासून हे कुटुंब कतारमध्येच वास्तव्यास आहे, मात्र दरवर्षी त्यांचा रत्नागिरी दौरा हा ठरलेला आहे. यंदा मात्र त्याला कोरोनाने ब्रेक लावला असून, 10 मार्च रोजीच्या भारत प्रवासासाठी काढलेली तिकीटे रद्द करावी लागली आहेत.
कतार हा 29 लाख लोकसंख्येचा छोटासा देश. पण अनेक देशांच्या नागरिकांना त्याने सामावून घेतले आहे. सध्या हजारोंच्या संख्येत मराठी माणसे कतारमध्ये वास्तव्यास आहेत. मुलींची छेडछाड हा प्रकार येथे बिलकूल नाही. येथे खूप कडक नियम आणि कायदे आहेत. इकडे सर्वत्र अति स्वच्छता आहे, दुकाने, मॉल वेळेत उघडतात, मेंटेनन्ससाठी येणारी माणसे अगदी ठरलेल्या वेळेत येतात. कतारला इंडियन स्कुल्स असून इंग्लिश मिडीयम असले तरी तिसरी भाषा म्हणून मराठी आणि संस्कृत विषय आहेत. घरातही मराठीच बोलले जाते. मोठा मुलगा निहार सध्या सुरत येथे इंजिनीरिंगचे शिक्षण घेत आहे. मे महिन्यात शिक्षण संपून तो परत येणार होता नेमक्या त्याचवेळी हे कोरोनाचे संकट आल्याचे ती सांगते.
उन्हाळी सुट्टी हीच मोठी सुट्टी असल्याने सर्वजण दरवर्षी न चूकता रत्नागिरीमध्ये येतात. मनोज मध्येच रत्नागिरीला जातात. पण सुटय़ा नसल्याने सर्वांनाच त्यावेळी जाता येत नाही. मनोज 10 मार्चला भारतात जाणार होते. पण कोरोनाने त्यालाही थांबवले.
कतारमध्ये 27 फेब्रुवारीला कोरोनाचा पेशंट सापडला. सरकारने ताबडतोब पोलीस बंदोबस्त कडक केला. सर्व विमानसेवा बंद केली. नवीन कायदे, नियम आणि त्यांची कडक अंमलबजावणी सुरु झाली. येथे आवश्यक सेवा सुरू आहेत. प्रत्येक दुकानात योग्य अंतर खरेदी करता येते. सध्या साडेपाच हजार रूग्ण आहे. 275 लोक बरेही झाले. प्रायव्हेट हॉस्पिटल व अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त शासकीय हॉस्पिटल, मेडिकल स्टाफ आणि कतार सरकार सर्वांची योग्य ती काळजी घेत आहे. work from home हा option आहे. मनोज यांना रिस्क घेऊन रेग्युलर डय़ुटी करावी लागतेय. Gas & Oil Sector सुरू ठेवायचे आहे. कंपनी एम्प्लॉइजची तितकीच काळजी घेत आहे.
येथील नागरिक कारणाशिवाय बाहेर कुठेच जात नाहीये. लॉकडाऊन नसले तरी प्रत्येक व्यक्ती सरकारच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करत आहेत. रोबोट आणि ड्रोनचाही वॉच ठेवण्यात आला आहे. नियम तोडल्यास जेल आणि दोन लाख रियालची शिक्षा आहे. मुलगी नेहा 12 वीत असल्याने तिचा ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू आहे. कतारमधील लोकांचे नातेवाईक बाहेरील देशात असतील तर फक्त त्यांच्यासाठी Qatar Airways नी आपली सेवा सुरू ठेवली आहे. त्यानंतर त्यांना होम quarntine हा ऑप्शन दिला आहे. आणि काहींना हॉटेलमध्ये रहाण्याची व्यवस्था केली असल्याचे त्या सांगतात. भारताविषयी बातम्या बघितल्यावर अधिक भिती जाणवते. कधी कधी सर्व पाश तोडून आपल्या माणसात….. भारतात जावे, असे प्रकर्षाने वाटते. पण मनात असले तरी आता इलाज नाहीये. आम्ही कतारला, मुलगा सुरतला तर सर्व रक्ताची नाती रत्नागिरीत आहेत. अर्थात सर्वजण त्या-त्या ठिकाणी सुरक्षीत आहेत. मात्र, सर्व भारतीयांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचा ठाम निर्धार करावा. आपले आयुष्य खूप मौल्यवान आहे, ते एकदाच मिळत असल्याने जगण्यावर प्रेम करा, त्यासाठी नियमांचे काटेकोर पालन करा असे आवाहन त्यांनी केले. मुग्धा म्हणतात की कर्मभूमीप्रमाणेच मातृभूमीही आम्हाला अधिक प्रिय आहे. आमच्या कुटुंबाची जशी काळजी आहे तशीच माझ्या देशातील कुटुंबेपण तितकीच प्रिय आहेत म्हणूनच सर्वांनी “Stay Home, Stay Safe”