प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे शहराच्या बाहेरच भाजीमार्केट सुरू करण्यात आले होते. बी. एस. येडियुराप्पा मार्ग, आरटीओ मैदान आणि इंडॉल फॅक्टरीजवळील मैदानात ही मार्केट सुरू करण्यात आली होती. मात्र, मध्यंतरी झालेल्या वादळी पावसामुळे बी. एस. येडियुराप्पा मार्गावर उभारण्यात आलेल्या भाजीमार्केटवरील पत्रे वाऱयामुळे उडून गेल्यामुळे हे भाजीमार्केट बंद करण्यात आले. शेतकरी आणि काही खरेदीदार त्या ठिकाणी आपला व्यवसाय करत आहेत. ते सोशल डिस्टन्सबाबत गांभीर्य घेत नसल्याचे दिसून येत आहे. तेव्हा एपीएमसीने त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
बी. एस. येडियुराप्पा मार्गावर एपीएमसीने शेतकऱयांच्या सोयीसाठी व सुरक्षित अंतर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून तात्पुरते गाळे उभे केले होते. त्या गाळय़ांवरील पत्रे उडून गेले आहेत. त्यामुळे खरेदीदारांना आणि शेतकऱयांना समस्या निर्माण झाल्या आहेत. तेक्हा पुन्हा गाळे उभे करावेत, अशी मागणी व्यापारी वर्गातून आणि शेतकऱयांतून होत आहे.
कोरोनाची धास्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रुग्णांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे अजून बरेच दिवस शहराबाहेर भाजी खरेदी व विक्री करावी लागणार आहे. तेव्हा दक्षिण व पूर्व भागातील शेतकऱयांसाठी मार्केटची नितांत गरज असून तेथे किंवा दुसऱया जागेमध्ये पुन्हा गाळय़ांची उभारणी करावी आणि पुन्हा खरेदी-विक्रीस मुभा द्यावी, अशी मागणी होत आहे.
सध्या सकाळी काही शेतकरी त्या ठिकाणीच भाजी घेऊन येत आहेत. व्यापारीही त्यांची भाजी खरेदी करत आहेत. त्याचबरोबर खरेदीदारही तेथे येत आहेत. मात्र ते सोशल डिस्टन्स ठेवत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. तेव्हा त्याबाबतही जनजागृती करावी, अशी मागणी होत आहे. पावसाळय़ापूर्वी या भागातील शेतकऱयांसाठी नवीन भाजीमार्केट सुरू करावे. कारण या परिसरातील शेतकऱयांना लॉकडाऊन काळातच आरटीओ, भाजीमार्केट किंवा दूरवर असलेल्या हिंडाल्कोजवळ जावे लागत आहे. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करून पुन्हा या परिसरात इतरत्र ठिकाणी भाजीमार्केटची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.