शेतीच्या नुकसानीचा सर्व्हे करून मदत करण्याची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
मागील वषी अतिपावसामुळे तर यावषी मावा रोगामुळे भात पीक पूर्णपणे वाया गेले आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. हातातोंडाला आलेली भात पिके वाया गेली असून तातडीने त्याचा सर्व्हे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येळ्ळूरच्या शेतकऱयांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
येळ्ळूर हे गाव शेतीप्रधान म्हणून ओळखले जाते. खरीप हंगामामध्ये भात पिकाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात शेतकरी घेत असतात. भात पिकावरच शेतकरी अवलंबून असताना यावषी मावा रोगामुळे भात पीक पूर्णपणे वाया गेले आहे. यावषी पावसाने साथ दिल्यामुळे शेतकऱयांनीही शेतीमध्ये घाम गाळून उत्तम प्रकारे भाताचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या महिन्याभरापासून मावा रोगामुळे बासमती, इंदायणी व इतर जातीची भाते वाया गेली आहेत.
या रोगामुळे आता मोठा फटका बसला असून आताच तातडीने सर्व्हे करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱयांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. येळ्ळूर परिसरातील शेतकरी हा केवळ भातपिकावरच अवलंबून आहे. कारण पावसाळय़ात इतर पिके या ठिकाणी घेतली जात नाहीत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
शेतकरी विकास कृषी पतीन सोसायटी, जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल आणि रयत संघटनेच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. शेतकऱयांनी रोग पडलेले भात देखील यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणले होते. महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल, शिवाजी सुंठकर, शेतकरी विकास कृषी पतीन सोसायटी चेअरमन प्रदीप देसाई, संचालक डी. जी. पाटील, विलास नंदी, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, राजू मरवे, संचालक दौलत कुगजी, यल्लोजी टोपिनकट्टी, नागेंद्र पाखरे, राजू डोण्याण्णवर, हणमंत पाटील, मधू पाटील, दीपक कर्लेकर, माजी ग्राम पंचायत सदस्य तानाजी हलगेकर, रमेश धामणेकर, अनंत पाटील, मधुसुदन पाटील, सुभाष पाटील, तुकाराम धामणेकर, मनोहर पाटील, रामा कुंडेकर, गावडू पाटील, गोपाळ पाटील, गोपाळ देसाई यांच्यासह येळ्ळूर, वडगाव, शहापूर परिसरातील शेतकरी उपस्थित होते.