शेतकरी हवालदिल, हातातोंडाला आलेला घास पावसाने हिसकावला : निसर्गाच्या लहरीपणामुळे बळीराजा अक्षरशः हतबल
प्रतिनिधी /येळ्ळूर
शेतकऱयांनी मोठय़ा उत्साहात भाताच्या सुगीला सुरुवात केली होती. येळ्ळूर, वडगाव, शहापूर, सुळगा (ये.), अवचारहट्टी परिसरातील भात कापणीला सुरुवात झाली असताना रविवारी सायंकाळी जोरदार पावसाला सुरुवात झाली. यामुळे हातातोंडाला आलेले भातपीक वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
पावसाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱयांना दरवषीच बसत आहे. पाऊस कधी येईल हे सांगणे कठीण झाले आहे. परतीच्या पावसाने जोरदार झोडपले होते. त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली. मात्र गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि हवामानातील बदल यामुळे शेतकरी संभ्रमात अडकले होते. या संभ्रमावस्थेतच काही शेतकऱयांनी भात कापणी केली. मात्र रविवारी सायंकाळी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचे जोरदार आगमन झाले.
या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. भात कापून ठेवलेल्या शेतामध्ये पाणी साचून राहिले. कापून ठेवलेले भात पाण्यातच राहिल्यामुळे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. वर्षभर काबाडकष्ट करायचे आणि शेवटी निसर्गाच्या लहरीपणामुळे तेंडाचा घास नाहीसा होणे. यामुळे बळीराजा अक्षरशः हतबल झाला आहे. किती दिवस या लहरीपणाचा फटका सहन करायचा, या विवंचनेत शेतकरी अडकला आहे. महागाईमुळे शेती व्यवसाय परवडणे अशक्मय झाले आहे. मजुरांच्या तुटवडय़ामुळे शेती करणे अवघड झाले आहे.
गेल्या दोन वर्षांपासून महापुराच्या फटक्मयामुळे शेती करणे कठीण झाले आहे. मात्र, व्यवसाय असल्याने कर्ज काढून शेती करावी लागत आहे. असा फटका बसत असल्याने शेतकरी अडचणीत येत आहे. एकूणच या पावसामुळे भातपीक धोक्मयात आले आहे. येळ्ळूर, अवचारहट्टी, सुळगा, राजहंसगड, देसूर परिसरातील शेतकऱयांना या पावसाचा फटका बसला आहे.
धामणे शिवारालाही मोठा फटका
धामणे, नंदिहळ्ळी, नागेनहट्टी, यरमाळ यासह परिसरातील गावांमध्ये शेतकऱयांनी सुगीला सुरुवात केली होती. ही सुरुवात झाल्यानंतर रविवारी अचानकपणे जोरदार पाऊस आला आणि कापून ठेवलेले भात पाण्याखाली गेले. काही ठिकाणी शेतकरी भाताची मळणीही करत होते. त्या मळण्याही पावसात अडकल्या आहेत. यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. दसरोत्सवानंतर पावसाने उघडीप दिली. भात कापणीला आल्याने शेतकऱयांनी मजुरांना घेऊन भात कापणी केली. मात्र रविवारी अचानक पाऊस आल्याने मोठा फटका शेतकऱयांना बसला आहे.
रविवारी सायंकाळी गडगडून वळीव पावसाचे आगमन झाले आणि बघता बघता सर्वत्र पाणीच पाणी झाले. यापूर्वीही सोयाबिन पिकाची काढणी करताना पाऊस झाल्याने सोयाबिन खराब झाले होते. त्यानंतर आता पुन्हा भाताच्या सुगीला सुरुवात झाल्याने दोन्ही पिकांना फटका बसून शेतकरी संकटाच्या खाईत लोटला गेला आहे.