निकालाकडे साऱयांचेच लागले लक्ष
प्रतिनिधी /येळ्ळूर
येळ्ळूर वॉर्ड क्रमांक 8 मधील उमेदवार कै. महेश कानशिडे यांचे निधन झाले होते. त्यामुळे ती जागा रिक्त झाली होती. त्या वॉर्डासाठी सोमवारी मतदान झाले. 948 पैकी 696 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. मोठय़ा चुरशीने मतदान झाले असून निकालाकडे साऱयांचे लक्ष लागून राहिले आहे.
एकूण सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यामधील दोघांनी अर्ज माघार घेतल्याने चौघे जण रिंगणात होते. येळ्ळूर विभाग म. ए. समितीतर्फे शिवाजी नांदुरकर, तानाजी हलगेकर, परशराम मोटराचे, विजय धुळजी यांच्यामध्ये ही लढत झाली आहे. गुरूवार दि. 30 रोजी निकाल असून त्याच्याकडे साऱयांचेच लक्ष लागले आहे.
सोमवारी सकाळी 7 वाजता शिवाजी विद्यालयामध्ये मतदानाला सुरुवात झाली. सकाळच्या सत्रामध्ये मतदानासाठी मोठी गर्दी झाली. त्यानंतर दुपारी 3 पर्यंत जवळपास 60 टक्क्मयांहून अधिक मतदान झाले होते. सायंकाळी 5 वाजता एकूण 696 जणांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 374 पुरूष आणि 322 महिला मतदारांनी मतदान केले आहे. या ग्राम पंचायत निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी अरुण नायक यांनी काम पाहिले आहे.
गेल्या काही दिवसांपासून सर्वच उमेदवारांनी प्रचार केला होता. म. ए. समितीतर्फे सभा तसेच पदयात्राही काढण्यात आली होती. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली होती. आता साऱयांचेच भविष्य पेटीबंद झाले असूर गुरूवारी कोण बाजी मारणार हे स्पष्ट होणार आहे. सोमवारी मतदानावेळी या परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.