रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी आवकाळी पाऊस ढगाळ वातावरण; कामाल तापमान 39 अंश सेल्सीअस; लहरी वातावरणाचा फटका आंबा पिकाला
प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरण गेले काही दिवस असल्याने जिल्ह्याच्या एकूण वातावरणात कमालीचा चढ उतार पाहायला मिळत होता. पुणे वेधशाळेकडून पाप्त माहितीनुसार 14 मार्च रोजी राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान 39 अंश सेल्सीअस रत्नागिरीचे नोंदवण्यात आले. गेले काही दिवस जिल्ह्याचे तापमान कमालीचे वाढलेले आहे. या लहरी वातावरणाचा फटका जिल्ह्याचे मुख्य पीक असलेल्या आंब्यावर होत आहे.
पुणे वेधशाळेनुसार 15, 16 मार्चला कोकणात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या आंबा बागायतदारांची कामे सुरु आहेत. तसेच निर्बधांमध्ये शिथिलता देण्यात आल्याने शहराच्या मुख्य बाजारात गर्दी होताना दिसते आहे. त्यामुळे नागरिकानी घरा बाहेर पडताना योग्य ती काळजी घ्यावी. नागरीकांकडून नारळपाणी, ज्युस सेंटर येथे वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळण्यासाठी गर्दी होताना दिसते आहे.