रत्नागिरी/प्रतिनिधी
गेले आठवडाभर जिल्हा रुग्णालयात कोरोना विभागात उपचार घेणाऱ्या 48 वर्षीय रुग्णांचा शुक्रवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बळींची संख्या 29 वर पोहचली आहे.
संबंधित रुग्ण हा पावस कुर्धे येथील असून मुंबई प्रवास हिस्ट्री आहे. गेल्या आठवड्यात त्रास होऊ लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, यावेळी या रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.