प्रतिनिधी / रत्नागिरी
रत्नागिरीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या काहीसी कमी होत असली तरी मृत्यूंची संख्या वाढताना दिसत आहे. रविवारी आणखी २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या एकूण मृतांचा आकडा ६८१ इतका झाला आहे तर मागील 24 तासात नव्याने 499 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.
जिल्हा शासकीय रूग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी आरटीपीसीआर टेस्टमध्ये 199 तर ऍन्टीजेन टेस्टमध्ये 300 अशा एकूण 499 कोरोनाबाधित रूग्णांची नोंद करण्यात आली. यामध्ये रत्नागिरी तालुक्यात 174, दापोली 32, खेड 65, गुहागर 51, चिपळूण 73, संगमेश्वर 51, मंडणगड 00, लांजा 28 व राजापूर 25 असे रूग्ण आढळून आले यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाची लागण झालेली रूग्णसंख्या आता 23 हजार 302 इतकी झाली आह़े
तर जिल्ह्यामध्ये नव्याने 20 मृत्यूंची नोंद करण्यात आल़ी यामध्ये मृतांमध्ये रत्नागिरी तालुक्यातील 8, संगमेश्वर तालुक्यातील 2, चिपळूण 2, राजापूर 3, गुहागर 1, खेड 1, लांजा येथील 3 रूग्णांचा समावे आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या तालुकानिहाय आकडेवारीनुसार रत्नागिरी 177, खेड 83, गुहागर 29, दापोली 63, चिपळूण 135, संगमेश्वर 98, लांजा 38, राजापूर 51, मंडणगड 7 अशी नोंद आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या 681 इतकी पोहोचली असून मृत्यूदर 2.92 इतका आहे.