वाल्मिकी नायक समाजाचे निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
रमेश जारकीहोळी यांच्यावरील तक्रार मागे घेण्यात आली आहे. ते निर्दोष आहेत. तेव्हा त्यांना पुन्हा मंत्रिपद द्यावे, अशी मागणी जिल्हा वाल्मिकी नायक समाजाच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
राजकीय षङ्यंत्रातून रमेश जारकीहोळी यांच्यावर आरोप करण्यात आला होता. जाणूनबुजून त्यांना या प्रकरणात गोवण्यात आले. त्यामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. मात्र, आता त्यांच्यावरील तक्रारच मागे घेण्यात आली असून त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घ्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
शिरस्तेदार मंजुनाथ जानकी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अध्यक्ष राजशेखर तळवार, कार्यदर्शी दिनेश बागडे, मिथून गस्ती, संजय गुगरेड्डी, मल्लाप्पा नायक, लगमण्णा नायक, सिद्धेश्वर नायक, राजू नायक यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.