ऍड. राम आपटे यांचे प्रतिपादन : लोकमान्य ग्रंथालयामध्ये बुलक-चित्रलोकतर्फे ‘अक्षरछाया’ अंकाचे प्रकाशन
प्रतिनिधी/ बेळगाव
राजकारणामध्ये नैतिकता असली तरच देश उन्नतीकडे वाटचाल करतो. आज नेमकी त्याचीच उणीव आपल्याला दिसते आहे. या विचाराला मागे टाकण्याचा प्रयत्न आज होत असून आपण सावध व्हायला हवे, असे मत ऍड. राम आपटे यांनी व्यक्त केले.
लोकमान्य ग्रंथालयामध्ये शुक्रवारी महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्राr जयंती व कस्तुरबा जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने बुलक व चित्रलोक समूह यांच्यातर्फे ‘अक्षरछाया’ या अंकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर साहित्यिक गुणवंत पाटील, प्रतिभा आपटे उपस्थित होते.
ऍड. राम आपटे पुढे म्हणाले, महात्मा गांधींना जगभरात मान्यता आहे. परंतु आज देशामध्ये त्यांच्याबद्दल गैरसमज पसरविले जात आहेत. गांधीजींनी राजकारणात नैतिकतेची कास धरली. जातियतेला त्यांनी प्रखर विरोध केला. आपल्या राज्यघटनेमध्ये सर्वधर्म समभाव हे तत्त्व नमूद करण्यात आले आहे. दुर्दैवाने त्याला छेद देण्याचा प्रयत्न छुप्या पद्धतीने होत आहे. त्याला आपण विरोध करणे आवश्यक आहे.
यानंतर प्रतिभा आपटे यांनी गांधींची अनेक भजने सादर केली. गुणवंत पाटील यांनी ‘अक्षरछाया’ अंकाबद्दल माहिती दिली. सुधीर जोगळेकर यांनी पीडीएफ स्वरुपात ई-अंक प्रकाशित केला. यानंतर अक्षरछाया अंकाचे प्रकाशन करण्यात आले. या अंकामध्ये बेळगावमधील जुन्या आणि नव्या साहित्यिकांचे साहित्य आहे. या अंकाची संकल्पना बुलकचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांची आहे. संपादक मंडळामध्ये स्थानिक साहित्यिकांचा सहभाग आहे.
स्वागत व प्रास्ताविक ग्रंथालयाचे अध्यक्ष अशोक याळगी यांनी केले व लाल बहादूर शास्त्राrंना भेटल्याच्या आठवणींना उजाळा दिला. सूत्रसंचालन किशोर काकडे यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कोविडच्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला.