प्रतिनिधी / बेळगाव
राजहंसगड ते गर्लगुंजी या दरम्यानच्या रस्त्याचे काम 95 टक्के पूर्ण झाले आहे. परंतु उर्वरित 5 टक्के काम अद्यापही अपूर्ण आहे. बेळगाव तालुक्मयातील काही भागातील रस्ता अपूर्ण असल्याने त्याचा त्रास वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. या मार्गावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
राजहंसगड ते गर्लगुंजी गावापर्यंतचा रस्ता हा दोन तालुक्मयांच्या सीमेवर आहे. राजहंसगड हे गाव बेळगाव ग्रामीण मतदारसंघात येते तर गर्लगुंजी हे गाव खानापूर मतदारसंघात येते. खानापूर तालुक्मयाच्या हद्दीपासून खानापूर गावापर्यंत यापूर्वी अरुंद रस्ता होता. यामुळे वारंवार या मार्गावर अपघात होत होते. काही महिन्यांपूर्वी या रस्त्याची रुंदी वाढवून डांबरीकरण करण्यात आले. राजहंसगड ते क्वॉलिटी पोल्ट्री फॉर्मपर्यंतचा रस्ता महिन्याभरापूर्वी करण्यात आला.
परंतु या दोन्ही तालुक्मयांच्या हद्दीजवळच्या रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम अपूर्ण आहे. यामुळे संपूर्ण रस्ता चकाचक होऊनही काहीशा अर्धवट कामामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. बेळगाव तालुक्मयाच्या हद्दीतील रस्त्याचे काम अपूर्ण असल्याने लोकप्रतिनिधींनी या रस्त्याचे काम पावसाळय़ापूर्वी पूर्ण करण्याची मागणी होत आहे.