अनेक दिवसांपासून खोदाई करण्यात आलेल्या गटारीचे काम अर्धवट ठेवल्याने होताहेत हाल : मनपाचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
मनपाचे काम आणि बारा महिने थांब यात काही शंका नाही. अनेक ठिकाणी अर्धवट कामे सोडून देण्यात धन्यता मानण्यात येते. राजारामनगर-उद्यमबाग येथेही अशीच अवस्था झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून या ठिकाणी गटारीसाठी खोदाई करण्यात आली आहे. मात्र या गटारीचे काम करण्यात आले नाही. परिणामी परिसरातील कारखानदार व कामगारांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तेव्हा याकडे गांभीर्याने लक्ष देऊन गटारीचे काम पूर्ण करावे व कारखान्यात जाण्यासाठी मार्ग खुला करावा, अशी मागणी होत आहे.
बेळगाव शहराबरोबरच अनेक ठिकाणी मनपाच्या अर्धवट कामांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. राजारामनगर-उद्यमबाग येथेही मागील अनेक दिवसांपासून गटारीसाठी खोदाई करण्यात आली आहे. पण गटारीचे काम अजूनही अर्धवटच आहे. काम अर्धवट असल्याने खोदाई करण्यात आलेले खड्डे जैसे थे आहेत. पावसाळय़ात या ठिकाणी अपघातही घडत आहेत. तेव्हा याचा गांभीर्याने विचार करून हे काम त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
या ठिकाणी खोदाई करण्यात आल्याने कारखान्यात जाण्यास समस्या निर्माण होत आहे. रात्री-अपरात्री या ठिकाणी कामगारांची वर्दळ असते. काहीवेळा विद्युत पुरवठाही खंडित होतो. त्यामुळे येथे खोदाई करण्यात आलेल्या गटारीचा अंदाज येत नसल्याने अपघात होण्याची शक्मयता आहे. काहीजण यामध्ये पडून जखमीही झाले आहेत. तेव्हा गटारीचे काम पूर्ण करून येथील कामगारांच्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी होत आहे.
रस्त्यांचे कामही अर्धवट
राजारामनगर-उद्यमबाग येथील रस्त्यांची कामेही अर्धवट ठेवण्यात आली आहेत. रस्त्यावर फक्त खडी पसरण्यात आली असून प्रवाशांना कसरत करावी लागत आहे. याबाबत महानगरपालिकेकडे तक्रार करण्यात आली तरी दुर्लक्ष करण्यात येत आहे. मनपाच्या अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन गटारी व रस्ता दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.