पक्षातर्फे निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा : साखळी नगरपालिका काँग्रेसकडे राखण्यात मोलाचा वाटा. पक्षाच्या कार्याला जोर.
डिचोली / प्रतिनिधी
साखळी मतदारसंघातील यावेळी विधानसभा लढत हि काँग्रेस पक्षासाठी प्रति÷sची बनली आहे. ज्याप्रमाणे भाजप पक्ष साखळी मतदारसंघात आपल्या गटात वेगवेगळय़ा नेत्यांचा प्रवेश करून घेत आहेत. ते पाहता काँग्रेस पक्षासमोर या निवडणुकीत भाजप कठीण आव्हान ठेवणार असे वाटत आहे. परंतु सध्या साखळी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांनी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केल्याने काँग्रेस पक्षाला अधिक बळ प्राप्त झाले आहे. पक्षाचे कार्य अधिक बळकटीने पुढे जाऊ लागले आहे.
विर्डी गावचे नगरसेवक असलेल्या राजेश सावळ यांनी नगरपालिका निवडणूक भाजपच्या उमेदवारीवर जिंकली होती. परंतु त्यानंतर आपल्या कामांना योग्य प्रकारे महत्त्व आणि सहकार्य मिळत नसल्याचे पाहून त्यांनी भाजप पक्षापासून दूरच थाहणे पसंत केले. मध्यंतरी साखळी नगरपालिकेवर असलेले काँग्रेस पक्षाचे राज्य खाली खेचण्यासाठी सावळ हे जरी भाजप गटाय सामील झाले असले तरी नंतर त्यांनी काँग्रेस गटाबरोबरच राहणे पसंत केले होते.
साखळी मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या कार्यात त्यांनी या पक्षात प्रवेश करण्यापूर्वीच स्वतःला झोकून दिले होते. या पक्षातील नेते माजी आमदार प्रताप गावस, नगरसेवक धर्मेश सगलानी, प्रवीण ब्लेगन, गटाध्यक्ष मंगलदास नाईक, महादेव खांडेकर यांच्या समवेत साखळी मतदारसंघात काँग्रेस पक्षातर्फे होणाऱया सर्व आंदोलन, उपक्रमांमध्ये सहभागी होत भाजप सरकार विरोधात आवाज उठवला आहे.
साखळी नगरपालिकेवर सध्या असलेली काँग्रेस गटाची सत्ता खाली खेचण्यासाठी भाजप गटाने मोठे प्रयत्न केले होते. त्यात राजेश सावळ यांना आपल्या गटात घेण्यासाठी त्यांना ऑफरही देण्यात आली होती. परंतु सदर प्रलोभनांना न जुमानता सावळ यांनी काँग्रेस गटातच राहून सत्ता राखण्यात मोठा वाटा उचलला. त्यांच्यावर विविध प्रकरणे काढून तक्रारीही नोंदविण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या इमारतीच्या विषयावरून थेट त्यांच्यावर अपात्रतेचा खटला गुदरण्यात आला आहे.
आज राजेश सावळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश केल्यानंतर या पक्षाच्या कार्याला बळ प्राप्त झाले आहे. साखळी जरी मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ असला तरी या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचीही ताकद मोठी आहे. या पक्षातर्फे निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी राजेश सावळ यांनी केली असून आपली दावेदारी पक्षाला कळवली आहे. पक्षाने जर आपल्यावर विश्वास दाखवून उमेदवारी दिली तर साखळी मतदारसंघात चौफेर विकास साधण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
सध्या साखळी मतदारसंघात काँग्रेस पक्षातर्फे घर घर चलो अभियान सुरू असून या अभियानांतर्गत मतदारसंघातील ग्रामीण भागात फिरत असताना या मतदारसंघात या सरकारने केलेल्या विकासाची जाणीव येते. आज खाण बंदी आणि इतर समस्यांमुळे मतदारसंघातील लोकांसमोर अनेक समस्या आहेत. काही भागातील लोकांपासून तर विकास बराच दूर आहे. या लोकांचे राहणीमान उंचावण्यासाठी योग्य नियोजनाची आवश्यकता आहे. त्याचा आराखडा आपल्या डोक्मयात असून त्यासाठी जर काँग्रेस पक्षाने व साखळीतील जनतेने आपल्यावर विश्वास ठेवल्यास लोकांच्या अपेक्षेप्रमाणे विकास साधण्याची किमया आपण साध्य करू शकतो, अशी प्रतिक्रिया उपनगराध्यक्ष राजेश सावळ यांनी व्यक्त केली.