पणजी / प्रतिनिधी
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गोव्यातील लोकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. दिवाळी हा दिपज्योतीचा सण असून जात, धर्म बाजुला सारून देशात सर्वत्र मोठय़ा आनंदाने आणि उत्साहाने दिवाळी सण साजरा केला जातो. आपल्या देशाच्या विशाल आणि वैविध्यपूर्ण सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीतील दिव्यांच्या अनोख्या देखाव्याने अज्ञान, असत्य, अहंकार यांच्या गडद शक्तीना व निस्वार्थपणाला दूर करण्यास हा सण मदत करतो. ज्ञान, सत्य, नम्रता आणि मानवजातीची सेवा करण्याच्या सकारात्मक शक्तीनी आपल्या अंतकरणास प्रकाशित करा त्याचबरोबर हा दैवी उत्सव आपल्या ऐक्मयात एकतेच्या भावनेस बळकटी देवो.’’ असे राज्यपालांनी संदेशात म्हटले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकीय जनतेला दिपावली निमित्त मंगलमय शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी हा सण अंधारावर प्रकाशाच्या, वाईटावर चांगल्याच्या, नैराश्यावर आशावादाच्या आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचा द्योतक आहे. हा सण वैश्विक बंधुभाव, एकता व समतेचा सोहळा असल्याचेही त्यांनी नमूद केले. कोविडच्या छायेत हा सण साजरा करत असलो तरी एकंदर परिस्थिती सुधारत असल्याचे आश्वासक चित्रही निर्माण होत आहे ही आनंदाची बाब आहे असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केले. मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की या सणाच्या निमित्ताने महामारीवर मात करत आपण सारे पुन्हा प्रगतीपथावर अग्रेसर व्हावे! ही दिपावली सर्वांच्या आयुष्यात शांती, समाधान, ऐश्वर्य, चांगले आरोग्य व सुयश घेऊन येवो ही सदिच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.