मुंबई प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारकडून आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होत आहे.अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. काल विधिमंडळात २०२१-२०२२ चा आर्थिक पाहणी अहवाल सादर करण्यात आला.त्यानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत १२.१ टक्क्यांची वाढ तर देशाच्या अर्थव्यवस्थेत ८.९ टक्क्यांची वाढ होण्याची अपेक्षा आहे. राज्याच्या कृषी तसेच कृषीपुरक क्षेत्रातही ४.४ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. आता या अर्थसंकल्पातून राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला काय मिळणार याकडे संपूर्ण राज्यातल्या जनतेचं लक्ष लागून राहीलं आहे.