बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई आज, उच्च शिक्षण, पीडब्ल्यूडी आणि गृहनिर्माण विभागाच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बोलताना राज्याच्या विकासाला गती देणे हे त्यांचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले.
“इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमुळे आर्थिक क्रियाकलापांना चालना मिळेल, गरीबांचे सामाजिक आणि आर्थिक जीवन सुधारावे लागेल, हे लक्षात घेऊन मी माझे काम सुरू केले आहे,” असे त्यांनी स्वातंत्र्यदिनी जाहीर केलेल्या विविध कार्यक्रमांकडे लक्ष वेधताना सांगितले.
मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना कार्यक्रमांची जलद अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. ते म्हणाले की, अधिकार्यांना अशा प्रकारे कार्य करण्यास सांगितले गेले आहे की सरकारचे उपक्रम लोकांपर्यंत पोहोचतील.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी सरकारी कार्यक्रमात भेटवस्तू देण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खर्चाला फाटा देत राज्यातील विकासाला महत्व देत असल्याचे यावरून दिसत आहे.