विधानपरिषदेत पीडीओंबाबत जोरदार चर्चा, तातडीने नियुक्तीची मागणी : पीडीओंसाठी वसतिगृहेही बांधा
प्रतिनिधी /बेळगाव
राज्यात एकूण 5 हजार 962 ग्राम पंचायती आहेत. या ग्राम पंचायतमधील अनेक ग्राम पंचायतींमध्ये पीडीओ नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. गावचा विकास झाला तरच देशाचा होऊ शकतो. तेव्हा ग्राम पंचायतमधील खाली जागा तातडीने भराव्यात, अशी मागणी विधानपरिषदेत सदस्य साबण्णा तळवार, निंगाप्पा यांनी केली आहे.
ग्राम पंचायतमध्ये पीडीओ नसतातच. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला कामासाठी ग्राम पंचायतचे उंबरे झिझवावे लागत आहेत. बैठका आहेत म्हणून सांगून गावाकडे पीडीओ फिरकत नाहीत. याचबरोबर ग्राम पंचायतमध्ये कोणताही उतारा किंवा इतर कागदपत्रे देण्यासाठी नागरिकांना वेठीस धरले जात आहे. भ्रष्टाचार मोठय़ा प्रमाणात होत असल्याचा आरोपही या दोन्ही विधानपरिषद सदस्यांनी केला आहे. त्यांच्यावर सरकारचे कोणतेच नियंत्रण नाही. त्यामुळे ग्राम पंचायतींचा कारभार गोंधळाचा होताना दिसत असल्याचा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला आहे.
यावर ग्राम विकास आणि पंचायतराज मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी राज्यामधील 727 ग्राम पंचायतींमधील पीडीओंच्या जागा रिक्त आहेत. त्या जागा भरण्यासाठी अर्थविभागाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. लवकरच त्या जागा भरू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र सध्या काही पीडीओंवर अनेक ग्राम पंचायतींची जबाबदारी सोपविलेली आहे. त्यामुळे त्यांच्यावर ताण पडत आहे. तेव्हा तातडीने या जागा भराव्यात, अशी मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली आहे.
कोविडमुळे समस्या निर्माण झाली होती. मात्र निश्चितच त्यावर तोडगा काढू, असे आश्वासन ईश्वराप्पा यांनी दिले आहे. ग्राम पंचायत पीडीओंना त्या ठिकाणीच राहण्यासाठी वसतिगृह बांधावे. जेणेकरून त्याच ठिकाणी पीडीओ राहतील, असे काही सदस्यांनी सांगितले. मात्र काही सदस्यांनी पीडीओंना घरे बांधून दिला तरी त्या ठिकाणी राहणार नाहीत. गाव सोडून शहराच्या ठिकाणीच हे पीडीओ राहत आहेत. तेव्हा त्यांच्यावर योग्य निर्बंध घालणे आणि नियमावली करणे गरजेचे असल्याची चर्चादेखील झाली.
यावेळी विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी यांनीही पीडीओंना त्याचठिकाणी घरे बांधण्याबाबत चर्चा करून निर्णय घ्यावा, असे स्पष्ट केले. एकूणच ग्राम पंचायत पीडीओंबद्दल अनेकांनी तक्रारी केल्या आहेत. सर्वसामान्य जनतेची कामे करण्यास ते नेहमीच टाळाटाळ करतात. उद्धट उत्तरे देतात. वरि÷ कार्यालयाकडे बैठका आहेत, कामे आहेत असे सांगून ग्राम पंचायतमधील कामांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी अनेक सदस्यांनी केला. यावर मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी तातडीने याबाबत वरि÷ अधिकाऱयांची बैठक घेऊन सूचना केल्या जातील, असे आश्वासन दिले आहे.
आदेशाचे पालन करण्यास पीडीओंना भाग पाडा…
पीडीओंनी ग्राम पंचायतच्या कार्यक्षेत्रातच वसती राहण्याचा आदेश 2016 साली आला आहे. त्या आदेशाचे पालन करण्यास पीडीओंना भाग पाडा, अशी सूचना साबण्णा तळवार यांनी केली. यावर बहुसंख्य सदस्यांनी त्याचे पालन करा म्हणून जोरदार मागणी केली आहे.