प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील शेतकऱयांना खरीप हंगामातील पेरणीसाठी बियाणांच्या 2,35,865 किटचे वितरण करण्यात आले आहे. द्विदल धान्याचे मोठय़ा प्रमाणात उत्पादन होण्यासाठी शेतकऱयांना प्रोत्साहन दिले जात आहे, अशी माहिती कृषीमंत्री बी. सी. पाटील यांनी दिली. सोमवारी बेंगळुरात ते पत्रकारांशी बोलत होते.
यंदा देखील शेतकऱयांना दर्जेदार बियाणे आणि खतांचे वितरण केले जात आहे. शेतकऱयांना उच्च प्रतीची बियाणे मिळावित आणि फसवणूक टाळण्यासाठी राज्यात निकृष्ट बियाणांची विक्री करणाऱया दुकानांवर छापे टाकण्यात आले आहेत. 204 बियाणे विपेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. याचबरोबर 4.24 कोटी रुपये किमतीची निकृष्ट बियाणे आणि कीटकनाशके जप्त करण्यात आली आहेत, असे त्यांनी सांगितले.
यंदा आतापर्यंत 220 मि. मी. पाऊस झाला असून तो मागील वर्षाच्या तुलनेत 31 टक्के अधिक आहे. तसेच गेल्या वषीपेक्षा जास्त धान्य पिकले आहे. एकूण 77 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी करण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले असून राज्यात कोठेही बियाणांची कमतरता नाही. आपण 12 जिल्हय़ांचा प्रवास केला असून कोठेही समस्या आढळून आलेली नाही. वितरणासाठी सुमारे 1.15 लाख क्विंटल बियाणे साठवून ठेवण्यात आली आहे, असेही मंत्री बी. सी. पाटील म्हणाले.