बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण सुरु आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. दुसऱ्या लाटेत कोरोना संसर्गाचा वेग जास्त होता. त्यामुळे सरकारला तयारीला जास्त वेळ मिळाला नाही. आता कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एक पर्याय आहे. दरम्यान कोरोनाची दुसरी लाट कमी कमी होत असून संभाव्य तिसरी लाट येण्याआधी ७५ टक्के प्रौढांचे लसीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथ नारायण यांनी सांगितले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री सी.एन. अश्वथ नारायण म्हणाले की लसीचा पुरवठा हळूहळू वाढेल. केंद्राकडून लस मिळेल त्याप्रमाणे लसीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, अधिकाधिक लोक लसीकरणात सहभाग घेत आहेत. लसीचा पुरवठा होईल त्याप्रमाणे तिसरी लाट येण्यापूर्वी ७५ टक्के प्रौढांना लस देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे, असे ते म्हणाले.